५ दिवसांत वाढली इतकी मागणी, लक्षद्वीपला जाण्यासाठी सर्व फ्लाईट मार्चपर्यंत बुक

  136

नवी दिल्ली: पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप (Lakshadweep) दौऱ्यानंतर मालदीव (Maldives)च्या मंत्र्यांनी केलेल्या अपमानजनक ट्वीटनंतर झालेल्या वादादरम्यान केवळ ५ दिवसांतच लक्षद्वीपला जाणाऱ्या सर्व फ्लाईट्स मार्चपर्यंत बुक झाल्या आहेत.


देशातील आणखी एक पर्यटन स्थळ असलेल्या लक्षद्वीपला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आयलँडचा दौरा केला होता. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर लक्षद्वीपचे गुगल सर्च वाढले होते. अनेक ट्रॅव्हल एजन्सीमध्येही लक्षद्वीपबाबतची चौकशी वाढली होती.


लक्षद्वीपसाठी केवळ एक एअरलाईन कंपनी अलायन्स एअर फ्लाईट चालवते. ही कंपनी केरळच्या कोची आणि लक्षद्वीपच्या अहत्तीद्वीप यांदरम्यान एअर सर्व्हिस चालवते. कोचीवरून अगत्तीला जाण्यासाठी एक तास तीन मिनिटांचा वेळ लागतो. एका मीडिया रिपोर्टनुसार ही कंपनी कोची आणि लक्षद्वीपल यांच्यात दररोज ७० ते ७२ सीट असलेल्या एटीआर ७२ विमानाला चालवण्याचे काम करते. कोच्ची-अगत्ती फ्लाईटचे मार्चपर्यंत तिकीच विकले आहेत.


लक्षद्वीपचा मुद्दा समोर आल्यानंतर याबद्दलची चर्चाही वाढली आहे. दरम्यान, तज्ञांच्या मते इतक्या वेगाने वाढणाऱ्या गर्दीला सांभाळताना लक्षद्वीपचा कमकुवत ढाचा सक्षम नाहीये. एकदा मोठ्या संख्येने लोक लक्षद्वीपला पोहोचल्यास तेथे अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात

PM Modi : एनडीएच्या बैठकीत मोदींचा सत्कार; 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'महादेव'च्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव! पाहा VIDEO

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली येथे झालेल्या एनडीए संसदीय

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती