५ दिवसांत वाढली इतकी मागणी, लक्षद्वीपला जाण्यासाठी सर्व फ्लाईट मार्चपर्यंत बुक

नवी दिल्ली: पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप (Lakshadweep) दौऱ्यानंतर मालदीव (Maldives)च्या मंत्र्यांनी केलेल्या अपमानजनक ट्वीटनंतर झालेल्या वादादरम्यान केवळ ५ दिवसांतच लक्षद्वीपला जाणाऱ्या सर्व फ्लाईट्स मार्चपर्यंत बुक झाल्या आहेत.


देशातील आणखी एक पर्यटन स्थळ असलेल्या लक्षद्वीपला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आयलँडचा दौरा केला होता. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर लक्षद्वीपचे गुगल सर्च वाढले होते. अनेक ट्रॅव्हल एजन्सीमध्येही लक्षद्वीपबाबतची चौकशी वाढली होती.


लक्षद्वीपसाठी केवळ एक एअरलाईन कंपनी अलायन्स एअर फ्लाईट चालवते. ही कंपनी केरळच्या कोची आणि लक्षद्वीपच्या अहत्तीद्वीप यांदरम्यान एअर सर्व्हिस चालवते. कोचीवरून अगत्तीला जाण्यासाठी एक तास तीन मिनिटांचा वेळ लागतो. एका मीडिया रिपोर्टनुसार ही कंपनी कोची आणि लक्षद्वीपल यांच्यात दररोज ७० ते ७२ सीट असलेल्या एटीआर ७२ विमानाला चालवण्याचे काम करते. कोच्ची-अगत्ती फ्लाईटचे मार्चपर्यंत तिकीच विकले आहेत.


लक्षद्वीपचा मुद्दा समोर आल्यानंतर याबद्दलची चर्चाही वाढली आहे. दरम्यान, तज्ञांच्या मते इतक्या वेगाने वाढणाऱ्या गर्दीला सांभाळताना लक्षद्वीपचा कमकुवत ढाचा सक्षम नाहीये. एकदा मोठ्या संख्येने लोक लक्षद्वीपला पोहोचल्यास तेथे अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या