५ दिवसांत वाढली इतकी मागणी, लक्षद्वीपला जाण्यासाठी सर्व फ्लाईट मार्चपर्यंत बुक

नवी दिल्ली: पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप (Lakshadweep) दौऱ्यानंतर मालदीव (Maldives)च्या मंत्र्यांनी केलेल्या अपमानजनक ट्वीटनंतर झालेल्या वादादरम्यान केवळ ५ दिवसांतच लक्षद्वीपला जाणाऱ्या सर्व फ्लाईट्स मार्चपर्यंत बुक झाल्या आहेत.


देशातील आणखी एक पर्यटन स्थळ असलेल्या लक्षद्वीपला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आयलँडचा दौरा केला होता. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर लक्षद्वीपचे गुगल सर्च वाढले होते. अनेक ट्रॅव्हल एजन्सीमध्येही लक्षद्वीपबाबतची चौकशी वाढली होती.


लक्षद्वीपसाठी केवळ एक एअरलाईन कंपनी अलायन्स एअर फ्लाईट चालवते. ही कंपनी केरळच्या कोची आणि लक्षद्वीपच्या अहत्तीद्वीप यांदरम्यान एअर सर्व्हिस चालवते. कोचीवरून अगत्तीला जाण्यासाठी एक तास तीन मिनिटांचा वेळ लागतो. एका मीडिया रिपोर्टनुसार ही कंपनी कोची आणि लक्षद्वीपल यांच्यात दररोज ७० ते ७२ सीट असलेल्या एटीआर ७२ विमानाला चालवण्याचे काम करते. कोच्ची-अगत्ती फ्लाईटचे मार्चपर्यंत तिकीच विकले आहेत.


लक्षद्वीपचा मुद्दा समोर आल्यानंतर याबद्दलची चर्चाही वाढली आहे. दरम्यान, तज्ञांच्या मते इतक्या वेगाने वाढणाऱ्या गर्दीला सांभाळताना लक्षद्वीपचा कमकुवत ढाचा सक्षम नाहीये. एकदा मोठ्या संख्येने लोक लक्षद्वीपला पोहोचल्यास तेथे अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी