Narayan Rane : उबाठाची कोल्हेकुई : ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणावरील प्रेम बेगडी

Share

पर्यटन मंत्री पदावर ठाकरे असतानाच पाणबुडी प्रकल्प गुंडाळला : नारायण राणे

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळविण्यात आला अशी ओरड करत उबाठा गटाच्या अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शुक्रवारी एक्स (ट्विटर) वर ट्वीट करत मविआ सरकारच्या काळात पर्यटन मंत्री पदावर आदित्य ठाकरे असतानाच पाणबुडी प्रकल्प गुंडाळला असल्याचे स्पष्ट करताना उबाठा गटाच्या आरोप करणाऱ्यांचे पूर्णपणे वस्त्रहरण केले आहे.

ट्वीट करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले की, सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळवला, अशी खोटी आवई उठवून शिवसैनिकांनी कोल्हेकुई सुरु केली होती. खरी वस्तुस्थिती समोर आल्याननंतर त्यांची तोंडे आता कुलुपबंद झाली आहेत.

२०१८ मध्ये राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने वेंगुर्ल्यात पाणबुडी प्रकल्पाला सुरुवात केली. २०१९ च्या सुरुवातीला त्यासाठी निविदाही निघाली. परंतु या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्यांदाही या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ३० नोव्हेंबर २०१९ ते २६ जून २०२२ पर्यंत आदित्य ठाकरे हे राज्याचे पर्यटन मंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीच्या कालावधीत पर्यटन विभागामध्ये पाणबुडी प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय झाला. उद्धव ठाकरे आणि मंडळींचे कोकणावरचे प्रेम कसे बेगडी आहे ते दाखविणारा हा आरसा आहे. कदाचित बॉलिवूड पर्यटनात गुंतून पडल्यामुळे सिंधुदुर्गासाठी वेळ देता आला नसावा, असा टोलाही नारायण राणे यांनी ठाकरे पिता-पुत्रांना लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणबुडी प्रकल्प कोकणात होईल, अशी ग्वाही दिलेलीच आहे. उध्दव ठाकरे व त्यांच्या मुलाने घातलेला आणखी एक घोळ ते नक्कीच सोडवतील, असा आशावाद नारायण राणे यांनी ट्वीटच्या अखेरीस व्यक्त केला आहे.

या ट्वीटमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एका वर्तमानपत्राचे कात्रणही जोडले आहे. त्या कात्रणामध्ये स्पष्टपणे ‘पाणबुडीच्या पाठपुरावा करण्यात राज्य सरकार अपयशी, ‘सरकारी’ कारभाराने अडला पाणबुडी प्रकल्प, माझगाव डॉकचा करार’ असा स्पष्टपणे तपशील आहे.

पाणबुडी प्रकल्पावरून उबाठा गटाने खोटे आरोप करत महाराष्ट्रीयन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला होता. परंतु नारायण राणे यांच्या ट्वीटनंतर उबाठा गटाचा पाणबुडी प्रकरणातील खोटारडेपणा उघडकीस आला आहे.

Tags: narayan rane

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

27 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

28 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

30 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

42 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

46 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago