Smartphone: तुमच्या स्मार्टफोनला डब्बा बनवतात या ५ चुका

  169

मुंबई: अनेकजण केवळ छंद म्हणून सतत नवनवीन फोन घेत असतात. मात्र काही जण आपल्या चुकीमुळे आपला फोन वेळेच्या आधीच खराब करतात आणि त्यामुळे त्यांना नवीन फोन खरेदी करावा लागतो. यामुळे पैसेही खर्च होतात. फोन लवकर खराब होण्याचे तसेच त्याचा परफॉर्मन्स कमी होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा ५ चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन डब्बा बनू शकतो.



सॉफ्टवेअर अपडेट्सकडे दुर्लक्ष नको


जर तुम्ही तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आणि एप्स वेळेत अपडेट केले नाही तर याचा परिणाम फोनच्या कार्यक्षमतेवर होतो. सोबतच फोनमध्ये सुरक्षेचा धोका निर्माण होतो.



स्टोरेजला ओव्हरलोडपासून वाचवा


फोनची स्टोरेज साधारण फुल झाल्यासही याचा परफॉर्मन्स कमी होतो. फोन स्लो होतो. अशातच फोनमध्ये गरजेच्या नसलेल्या गोष्टी डिलीट करा.



जास्त एप्स इन्स्टॉल करू नका


जर फोनमध्ये गरजेपेक्षा जास्त एप्स असतील आणि बॅकग्राऊंडमध्ये असतील तर यामुळे फोन रिसोर्ज कंझ्युम करतो. सोबतच फोनच्या स्पीडवरही परिणाम होतो. अशातच ज्या एप्सचा वापर होत नाही ते डिलीट करा.



फोनची बॅटरी शून्यापर्यंत पोहोचवू नका


जर फोनची बॅटरी तुम्ही सतत शून्यापर्यंत पोहोचवली तर यामुळे प्रिमॅच्युअर बॅटरी डिग्रेडेशनचा धोका वाढतो. स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आर्यन बॅटरी २० ते ८० टक्केदरम्यान चार्जिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स देतात.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस