Smartphone: तुमच्या स्मार्टफोनला डब्बा बनवतात या ५ चुका

मुंबई: अनेकजण केवळ छंद म्हणून सतत नवनवीन फोन घेत असतात. मात्र काही जण आपल्या चुकीमुळे आपला फोन वेळेच्या आधीच खराब करतात आणि त्यामुळे त्यांना नवीन फोन खरेदी करावा लागतो. यामुळे पैसेही खर्च होतात. फोन लवकर खराब होण्याचे तसेच त्याचा परफॉर्मन्स कमी होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा ५ चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन डब्बा बनू शकतो.



सॉफ्टवेअर अपडेट्सकडे दुर्लक्ष नको


जर तुम्ही तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आणि एप्स वेळेत अपडेट केले नाही तर याचा परिणाम फोनच्या कार्यक्षमतेवर होतो. सोबतच फोनमध्ये सुरक्षेचा धोका निर्माण होतो.



स्टोरेजला ओव्हरलोडपासून वाचवा


फोनची स्टोरेज साधारण फुल झाल्यासही याचा परफॉर्मन्स कमी होतो. फोन स्लो होतो. अशातच फोनमध्ये गरजेच्या नसलेल्या गोष्टी डिलीट करा.



जास्त एप्स इन्स्टॉल करू नका


जर फोनमध्ये गरजेपेक्षा जास्त एप्स असतील आणि बॅकग्राऊंडमध्ये असतील तर यामुळे फोन रिसोर्ज कंझ्युम करतो. सोबतच फोनच्या स्पीडवरही परिणाम होतो. अशातच ज्या एप्सचा वापर होत नाही ते डिलीट करा.



फोनची बॅटरी शून्यापर्यंत पोहोचवू नका


जर फोनची बॅटरी तुम्ही सतत शून्यापर्यंत पोहोचवली तर यामुळे प्रिमॅच्युअर बॅटरी डिग्रेडेशनचा धोका वाढतो. स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आर्यन बॅटरी २० ते ८० टक्केदरम्यान चार्जिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स देतात.

Comments
Add Comment

अतिरिक्त आयुक्त डॉ ढाकणे यांच्याकडे मालमत्ता विभागासह पर्यावरणाचीही जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी डॉ अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. डॉ

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे' मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.