Mahayuti Candidate : ठरलं! अमरावतीतून 'यांना' मिळणार उमेदवारी

  127

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर पक्षांच्या मोर्चेबांधणीला आता सुरुवात झाली आहे. महायुती (Mahayuti) राज्यव्यापी मेळाव्यांचे आयोजन करणार आहे, तर महाविकास आघाडीचे (MVA) देखील निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असं असलं तरी महायुतीच्या हालचाली वेगवान आहेत, याची प्रत्येक वेळी प्रचिती येते. तर मविआमध्ये मात्र जागावाटपावरुनच संभ्रम आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे.


अमरावतीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकीकडे अमरावती लोकसभेत आपल्याकडे दोन आमदार असल्याचे सांगत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रहारला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. त्याशिवाय नवनीत राणा यांना जर उमेदवारी हवी असेल तर त्यांनी प्रहारकडून लढावं असंही कडू म्हणाले होते. त्यानंतर आता महायुतीतील प्रमुख पक्षाच्या अध्यक्षांनी नवनीत राणा या विजयी होतील असं म्हटल्याने राणा यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.


बावनकुळे यांनी ही उमेदवारी जाहीर करताना महायुतीच्या नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून ५१ टक्के मतांसह विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. मात्र, राणा कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु होती, मात्र बच्चू कडू यांनी त्यांना प्रहारच्या तिकीटावर निवडणूक लढवावी अशी मागणी केल्यामुळे राणा यांची उमेदवारी पक्की असली तरी चिन्ह पक्के झालेले नाही.


नवनीत राणा यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर राणा या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. यंदाच्या वर्षी त्या कोणाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक