Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील तुटलेल्या पुलाचा भाग वेल्डिंगनंतरही पुन्हा निखळला

कामगारांचा हलगर्जीपणा आला समोर


बुलढाणा : समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg) आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना (Accidents) समोर आल्या आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना देखील राबवत आहे. मात्र, या मार्गावर पुन्हा एकदा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे, समृद्धी महामार्गावरील पुलाचा ५ दिवसांपूर्वी तुटलेला भाग पुन्हा निखळला आहे. यावरुन या भागाची तात्पुरती डागडुजी करण्यात आल्याचं निदर्शनास येत आहे.


पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोरवरील बीड ते सिंदखेड राजा दरम्यान चेनेज ३१९ वरील एका पुलाचा लोखंडी भाग तुटून वर आला होता. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत दुरुस्ती कामास सुरुवात केली आणि तो लोखंडी भाग वेल्डिंग करुन पूर्ववत केला.


मात्र, पाचच दिवसांत त्या भागाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ज्याच्या हाती हे काम सोपवलं होतं त्या कामगारांनी हलगर्जीपणा केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी तात्पुरती वेल्डिंग करून दुरुस्ती केली आहे. त्यामुळे याकडे पुन्हा एकदा लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.


Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध