Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील तुटलेल्या पुलाचा भाग वेल्डिंगनंतरही पुन्हा निखळला

कामगारांचा हलगर्जीपणा आला समोर


बुलढाणा : समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg) आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना (Accidents) समोर आल्या आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना देखील राबवत आहे. मात्र, या मार्गावर पुन्हा एकदा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे, समृद्धी महामार्गावरील पुलाचा ५ दिवसांपूर्वी तुटलेला भाग पुन्हा निखळला आहे. यावरुन या भागाची तात्पुरती डागडुजी करण्यात आल्याचं निदर्शनास येत आहे.


पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोरवरील बीड ते सिंदखेड राजा दरम्यान चेनेज ३१९ वरील एका पुलाचा लोखंडी भाग तुटून वर आला होता. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत दुरुस्ती कामास सुरुवात केली आणि तो लोखंडी भाग वेल्डिंग करुन पूर्ववत केला.


मात्र, पाचच दिवसांत त्या भागाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ज्याच्या हाती हे काम सोपवलं होतं त्या कामगारांनी हलगर्जीपणा केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी तात्पुरती वेल्डिंग करून दुरुस्ती केली आहे. त्यामुळे याकडे पुन्हा एकदा लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.


Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे