Sunil Kedar : आजाराची नौटंकी करणार्‍या सुनील केदारांना डॉक्टरांनी पाठवले तुरूंगात

शिक्षेपासून वाचण्यासाठी करत होते प्रयत्न?


नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात (Nagpur bank scam) काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा आणि साडेबारा लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. शिक्षा सुनावल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कारागृहात जाण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय चाचणी करत असताना त्यांनी तब्येतीची तक्रार केली. मात्र, त्यांचे सर्व रिपोर्टस नॉर्मल आले असून डॉक्टरांनीच त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली आहे.


सुनील केदार दाखल असलेल्या नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील चार तज्ज्ञ डॉक्टरांनी काल रात्री त्यांची प्रकृती बरी असल्याचा अहवाल सादर केला. त्यांना मायग्रेनचा त्रास, न्यूमोनियाचे लक्षण आढळून आले होते. ताप वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. याशिवाय किडनीचाही संसर्ग झाल्याने उपचाराचा कालावधी वाढला. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती स्थिरावताच, ते ‘फिट’ असल्याचा अहवाल दिला. हा अहवाल येताच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, त्यांची तडकाफडकी कारागृहात रवानगी केली. गेल्या २२ डिसेंबरपासून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


रुग्णालयातील पथकाने सुनील केदार यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर त्यांना कारागृहात पाठवण्यासाठी केवळ अर्ध्या तासापूर्वी डिस्चार्ज करण्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना काही वेळ तयारीसाठी देण्यात आला व त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. आता त्यांना कारागृहातील ‘आफ्टर बॅरेक’मध्ये इतर कैद्यांसोबत ठेवण्यात येणार आहे.


सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवण्यात आला. अखेर नार्वेकरांनी त्यांची आमदारकी रद्द केली. हाती काहीच न उरल्यामुळे कुठून तरी वाचता येतंय का, याचा प्रयत्न ते करत होते. अखेर डॉक्टरांनी ते व्यवस्थित आणि फिट असल्याचं सांगत त्यांना तुरुंगात पाठवलं.


Comments
Add Comment

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र

President Draupadi Murmu: राष्ट्रपती २५ फेब्रुवारी रोजी करणार राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

अकोला :  भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २८

महाराष्ट्राचा सुपुत्र गुजरातच्या मुख्य निवडणूकअधिकारीपदी

अकोला : भारतीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची गुजरात राज्याचे नवीन मुख्य निवडणूक