Sunil Kedar : आजाराची नौटंकी करणार्‍या सुनील केदारांना डॉक्टरांनी पाठवले तुरूंगात

  963

शिक्षेपासून वाचण्यासाठी करत होते प्रयत्न?


नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात (Nagpur bank scam) काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा आणि साडेबारा लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. शिक्षा सुनावल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कारागृहात जाण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय चाचणी करत असताना त्यांनी तब्येतीची तक्रार केली. मात्र, त्यांचे सर्व रिपोर्टस नॉर्मल आले असून डॉक्टरांनीच त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली आहे.


सुनील केदार दाखल असलेल्या नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील चार तज्ज्ञ डॉक्टरांनी काल रात्री त्यांची प्रकृती बरी असल्याचा अहवाल सादर केला. त्यांना मायग्रेनचा त्रास, न्यूमोनियाचे लक्षण आढळून आले होते. ताप वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. याशिवाय किडनीचाही संसर्ग झाल्याने उपचाराचा कालावधी वाढला. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती स्थिरावताच, ते ‘फिट’ असल्याचा अहवाल दिला. हा अहवाल येताच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, त्यांची तडकाफडकी कारागृहात रवानगी केली. गेल्या २२ डिसेंबरपासून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


रुग्णालयातील पथकाने सुनील केदार यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर त्यांना कारागृहात पाठवण्यासाठी केवळ अर्ध्या तासापूर्वी डिस्चार्ज करण्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना काही वेळ तयारीसाठी देण्यात आला व त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. आता त्यांना कारागृहातील ‘आफ्टर बॅरेक’मध्ये इतर कैद्यांसोबत ठेवण्यात येणार आहे.


सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवण्यात आला. अखेर नार्वेकरांनी त्यांची आमदारकी रद्द केली. हाती काहीच न उरल्यामुळे कुठून तरी वाचता येतंय का, याचा प्रयत्न ते करत होते. अखेर डॉक्टरांनी ते व्यवस्थित आणि फिट असल्याचं सांगत त्यांना तुरुंगात पाठवलं.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या