Nana Patekar : देशाला भाजपशिवाय पर्याय नाही, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार

अभिनेते नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य


मुंबई : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हल्ली त्यांच्या अनेक राजकीय वक्तव्यांमुळे (Political statements) चर्चेत येत राहतात. त्यांचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'द व्हॅक्सिन वॉर' (The vaccine war) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. सध्या ते त्यांच्या आगामी 'ओले आले' (Ole ale) या मराठी चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यातच त्यांनी एक राजकीय भाकीत केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच निवडून येणार', असा दावा त्यांनी केला आहे.


एका वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांविषयी काय वाटतं, असा प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पाटेकर म्हणाले, "आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील. देशभरात हे सरकार शानदार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना यश नक्कीच मिळेल. तसेच भाजपाला पर्याय नाही. भाजपला बहुमत मिळणार आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार, यात काही शंका नाही", असं वक्तव्य नाना यांनी केलं आहे.





पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं. चारपैकी तीन राज्यांत भाजपने बाजी मारली. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजली जात होती. त्यात घवघवीत यश मिळवल्याने भाजप लोकसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळवण्याच्या मार्गावर आहे. त्यातच नाना पाटेकर यांनी भाजपला बहुमत मिळणार असं वक्तव्य केल्याने आता हे भाकीत खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४