Nana Patekar : देशाला भाजपशिवाय पर्याय नाही, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार

  150

अभिनेते नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य


मुंबई : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हल्ली त्यांच्या अनेक राजकीय वक्तव्यांमुळे (Political statements) चर्चेत येत राहतात. त्यांचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'द व्हॅक्सिन वॉर' (The vaccine war) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. सध्या ते त्यांच्या आगामी 'ओले आले' (Ole ale) या मराठी चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यातच त्यांनी एक राजकीय भाकीत केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच निवडून येणार', असा दावा त्यांनी केला आहे.


एका वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांविषयी काय वाटतं, असा प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पाटेकर म्हणाले, "आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील. देशभरात हे सरकार शानदार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना यश नक्कीच मिळेल. तसेच भाजपाला पर्याय नाही. भाजपला बहुमत मिळणार आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार, यात काही शंका नाही", असं वक्तव्य नाना यांनी केलं आहे.





पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं. चारपैकी तीन राज्यांत भाजपने बाजी मारली. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजली जात होती. त्यात घवघवीत यश मिळवल्याने भाजप लोकसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळवण्याच्या मार्गावर आहे. त्यातच नाना पाटेकर यांनी भाजपला बहुमत मिळणार असं वक्तव्य केल्याने आता हे भाकीत खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या