India Vs South Africa: ३१ वर्षांपासून विजयाच्या प्रतीक्षेत टीम इंडिया, आज इतिहास रचण्यासाठी उतरणार रोहित ब्रिगेड

मुंबई: भारतीय संघ आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच देशात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवक आतापर्यंतच्या इतिहासात एकही द्विपक्षीय मालिका जिंकलेली नाही.


भारतीय संघ १९९२पासून दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर कसोटी मालिका खेळत आहे. मात्र त्यांना आतापर्यंत एकाही मालिकेत विजय मिळवता आलेला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत आफ्रिकेत ८ द्विपक्षीय मालिका खेळल्या. यातील ७मध्ये त्यांना पराभव सहन करावा लागला तर १ अनिर्णीत राहिली होती.



दक्षिण आफ्रिकेत ९वी कसोटी मालिका खेळणार भारत


दोन्ही संघादरम्यान एकूण १५ द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यातील ४ मालिका भारताने जिंकल्या तर ८ मालिका गमावल्या. ३ मालिका अनिर्णीत राहिल्या. मात्र यावेळेस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतील विजयाचा दुष्काळ नक्कीच संपवणार आहे. गेल्या ३१ वर्षात जे जमले नाही ते यावेळेस करून दाखवण्याचा आफ्रिकेचा प्रयत्न असेल.


एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये ३६व्या दिवशी मिळालेल्या पराभवाला विसरून भारतीय संघाला मोठे यश मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावावी लागेल.



दक्षिण आफ्रिकेतील दोन्ही संघादरम्यानचा कसोटी रेकॉर्ड


एकूण कसोटी मालिका - ८
आफ्रिका संघाने जिंकलेल्या मालिका - ७
भारतीय संघाने जिंकलेल्या मालिका - ०
अनिर्णीत - १



रोहितकडे इतिहास रचण्याची संधी


एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माकडे कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांची बरोबरी साधण्याची संधी होती. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे तो विश्वकप विजेता कर्णधार बनू शकला नाही. आता त्याच्याकडे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याची संधी आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत