Kangana Ranaut : अखेर कंगना भाजपकडून निवडणूक लढवणार!

कंगनाच्या वडिलांनीच केली पुष्टी


मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) उत्तम अभिनेत्रींमध्ये कंगना रनौतचे (Kangana Ranaut) नाव घेतले जाते. कंगनाने आजवर आपल्या अनेक सिनेमांमधून दमदार भूमिका केल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिची बरीचशी वक्तव्ये राजकीय (Political Statements) असल्याने कंगना राजकारणात उतरणार की काय अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. आता या शंकेला कंगनाच्या वडिलांनीच पुष्टी दिली आहे. त्यामुळे कंगना २०२४ मध्ये भाजपकडून (BJP) लोकसभेसाठी (Loksabha) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत.


कंगनाचे वडील अमरदीप रनौत यांनी कंगनाच्या राजकीय प्रवेशाविषयी विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपने कंगनाला निवडणुकीचं तिकीट दिल्यास ती निवडणूक लढवण्यास तयार आहे. भाजप कंगनाला हिमाचल, महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्याची शक्यता तिच्या वडिलांनी वर्तवली आहे. याशिवाय भाजपने कंगनाला हिमाचलमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास मंडी लोकसभा मतदारसंघ हे तिचे कार्यक्षेत्र असेल.



कंगनाने घेतली जेपी नड्डांची भेट


कंगनाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची काही महिन्यांतच तिसर्‍यांदा भेट घेतली. रविवारी झालेल्या या भेटीत कंगनाच्या मनाली येथील निवासस्थानी नड्डा यांनी भाजपच्या इतर नेत्यांसोबत नाश्ताही केला होता. त्यामुळे कंगनाच्या भाजपमधील प्रवेशावर चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता वडिलांनीही पुष्टी दिल्याने कंगना लोकसभा निवडणूक लढवताना दिसण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन