Shreyas Talpade: १० मिनिटांपर्यंत थांबले होते श्रेयसचे हृदय, पत्नीने बॉबी देओलला सांगितली स्थिती

मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेला गुरूवारी हार्ट अॅटॅक आला होता. यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आता अभिनेता बॉबी देओलीने श्रेयसच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. त्याने सांगितले सुमारे १० मिनिटांपर्यंत अभिनेत्याचा श्वास थांबला होता.


बॉलिवूड हंगामाशी बोलताना बॉबी देओलने सांगितले की त्याने श्रेयस तळपदेच्या पत्नीशी बातचीत केली. यात तिने सांगितले की श्रेयसचे हृदय दहा मिनिटे थांबले होते. बॉबी देओलने सांगितले, मी आताच पत्नीशी बातचीत केली. ती खरंच तणावात होती. त्याचे हृदय सुमारे १० मिनिटे थांबले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि डॉक्टर्सनी त्याला पुन्हा आयुष्य दिले आहे. आता प्रार्थना करूया की तो लवकरात लवकर बरा व्हावा.



पत्नी श्रेयसने दिली होती माहिती


याआधी श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने अभिनेत्याच्या तब्येतीविषयी सांगितले होते. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करत श्रेयसची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले. दीप्तीने लिहिले, माझ्या पतीची तब्येत बिघडल्याचे ऐकल्यानंतर तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने मला साथ दिली यासाठी मी तुमची आभारी आहे. त्याची तब्येत आता स्थिर आहे आणि लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण