Shreyas Talpade: १० मिनिटांपर्यंत थांबले होते श्रेयसचे हृदय, पत्नीने बॉबी देओलला सांगितली स्थिती

मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेला गुरूवारी हार्ट अॅटॅक आला होता. यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आता अभिनेता बॉबी देओलीने श्रेयसच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. त्याने सांगितले सुमारे १० मिनिटांपर्यंत अभिनेत्याचा श्वास थांबला होता.


बॉलिवूड हंगामाशी बोलताना बॉबी देओलने सांगितले की त्याने श्रेयस तळपदेच्या पत्नीशी बातचीत केली. यात तिने सांगितले की श्रेयसचे हृदय दहा मिनिटे थांबले होते. बॉबी देओलने सांगितले, मी आताच पत्नीशी बातचीत केली. ती खरंच तणावात होती. त्याचे हृदय सुमारे १० मिनिटे थांबले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि डॉक्टर्सनी त्याला पुन्हा आयुष्य दिले आहे. आता प्रार्थना करूया की तो लवकरात लवकर बरा व्हावा.



पत्नी श्रेयसने दिली होती माहिती


याआधी श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने अभिनेत्याच्या तब्येतीविषयी सांगितले होते. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करत श्रेयसची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले. दीप्तीने लिहिले, माझ्या पतीची तब्येत बिघडल्याचे ऐकल्यानंतर तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने मला साथ दिली यासाठी मी तुमची आभारी आहे. त्याची तब्येत आता स्थिर आहे आणि लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर

दिवाळीसाठी गावाला जाताय, रेल्वे सोडतेय ३० विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त अतिरिक्त विशेष गाड्या धावणार मुंबई (प्रतिनिधी) : येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची