पेण खारेपाट ग्रामस्थांचे उपोषण मागे, कार्यकारी अभियंता यांचे लेखी आश्वासन

  69

पेण( देवा पेरवी ) - पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागातील गावांना पिण्याचे पाणी मिळावे या मागणी करिता मागील ८ दिवस सुरु असलेले आमरण उपोषण अखेर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी पत्राच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

भाजप आमदार रविशेठ पाटील, शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न पटलावर मांडून शासनाचे लक्ष वेधले. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या विभागात पाणीपुरवठा करीता 766 कोटींच्या प्रकल्पाला महिन्याभरात शासकीय मान्यता देण्याचे मान्य केले.

पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम मागील 16 वर्षांपासून प्रलंबित आहे. याच पाण्यावर येथील 52 गावांमधील 4268 हेक्टर सिंचन क्षेत्र आणि हजारो ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याकरिता पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून वाशी गावातील जगदंब माता मंदिराच्या प्रांगणात या विभागातील वेगवेगळ्या गावातील नऊ ग्रामस्थांनी आमरण उपोषण पुकारले होते.

अखेर आठव्या दिवशी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांनी लेखी पत्र देऊन काम लवकरात लवकर सुरू करण्याचे मान्य केल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.

एका महिन्यात जर याची पूर्तता झाली नाही तर सर्व उपोषणकर्त्ये पुन्हा मोठ्या स्वरूपात हे आमरण उपोषण सुरू करतील असा इशारा नंदा म्हात्रे - कणे, हेमंत पाटील - वाशी, जितेंद्र ठाकूर - ठाकूरबेडी, अभि म्हात्रे - भाल विठ्ठलवाडी, दिलीप म्हात्रे - भाल विठ्ठलवाडी, स्वप्निल म्हात्रे - सरेभाग, चंद्रहास म्हात्रे - वढाव, अश्विनी ठाकूर - दादर, अजित पाटील - वाशी, प्रकाश माळी व परिसरातील उपोषणकर्त्यांनी दिला.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या