Sansad Security Breach : संसदेतील घटनेने महाराष्ट्र विधीमंडळ हादरले!

घेतला 'हा' मोठा निर्णय


नागपूर : संसदेत (Sansad) लोकसभेच्या (Loksabha) कामकाजादरम्यान दोघांनी आतमध्ये घुसून स्मोक कँडल्स (Smoke candles) जाळल्याच्या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटले आहेत. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session) एक निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) यांनी हा निर्णय घेतला आहे.


संसदेमध्ये धूर करणारे दोघजण हे एका खासदाराच्या पासेसच्या आधारे संसदेत आले होते. ते कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले होते. त्यावेळीच त्यांनी संधी साधत थेट सभागृहात उडी मारली आणि कोणालाही काही कळायच्या आत स्मोक कँडल्स फोडून धूर केला. या घटनेनंतर राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आता गॅलरी पासेस देणं बंद केलं आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास मिळणार नसल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.


विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार आहेत. अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेतील आजच्या घटनेनंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली. लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधीमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार