Sansad Security Breach : संसदेतील घटनेने महाराष्ट्र विधीमंडळ हादरले!

घेतला 'हा' मोठा निर्णय


नागपूर : संसदेत (Sansad) लोकसभेच्या (Loksabha) कामकाजादरम्यान दोघांनी आतमध्ये घुसून स्मोक कँडल्स (Smoke candles) जाळल्याच्या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटले आहेत. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session) एक निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) यांनी हा निर्णय घेतला आहे.


संसदेमध्ये धूर करणारे दोघजण हे एका खासदाराच्या पासेसच्या आधारे संसदेत आले होते. ते कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले होते. त्यावेळीच त्यांनी संधी साधत थेट सभागृहात उडी मारली आणि कोणालाही काही कळायच्या आत स्मोक कँडल्स फोडून धूर केला. या घटनेनंतर राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आता गॅलरी पासेस देणं बंद केलं आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास मिळणार नसल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.


विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार आहेत. अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेतील आजच्या घटनेनंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली. लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधीमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद