Sansad Security Breach : संसदेतील घटनेने महाराष्ट्र विधीमंडळ हादरले!

  113

घेतला 'हा' मोठा निर्णय


नागपूर : संसदेत (Sansad) लोकसभेच्या (Loksabha) कामकाजादरम्यान दोघांनी आतमध्ये घुसून स्मोक कँडल्स (Smoke candles) जाळल्याच्या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटले आहेत. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session) एक निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) यांनी हा निर्णय घेतला आहे.


संसदेमध्ये धूर करणारे दोघजण हे एका खासदाराच्या पासेसच्या आधारे संसदेत आले होते. ते कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले होते. त्यावेळीच त्यांनी संधी साधत थेट सभागृहात उडी मारली आणि कोणालाही काही कळायच्या आत स्मोक कँडल्स फोडून धूर केला. या घटनेनंतर राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आता गॅलरी पासेस देणं बंद केलं आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास मिळणार नसल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.


विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार आहेत. अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेतील आजच्या घटनेनंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली. लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधीमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या