Ravindra Berde passed away : पछाडलेला, झपाटलेला, धडाकेबाज असे सिनेमे गाजवलेले अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

  284

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे होते सख्खे बंधू; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


मुंबई : मराठी मनोरंजन सृष्टीत (Marathi industry) आपल्या विनोदी भूमिकांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मागील काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अचानक हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संबंध मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


रवींद्र बेर्डे यांना यापूर्वी १९९५ मध्ये नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र त्यावेळेस या धक्क्यातून ते सावरले होते. त्यानंतर २०११ मध्ये त्यांना घशाच्या कर्करोगाने ग्रासले. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. उपचारानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी देखील सोडले. सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला.


रवींद्र बेर्डे विनोदाचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे सख्खे बंधू आहेत. आजवर लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, भरत जाधव, अशोक सराफ, विजय चव्हाण, विजू खोटे यांच्या जोडीने त्यांनी केलेल्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंडं असा परिवार आहे.


रवींद्र बेर्डे यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांतून लक्षात राहण्यासारख्या भूमिका निभावल्या आहेत. कधी मुलीचा कडवट बाप तर कधी हवालदार अशा विनोदी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. पछाडलेला, झपाटलेला, धडाकेबाज, धुडगूस, गोंद्या मारतंय तंगडं, आयत्या घरात घरोबा, चंगू मंगू, माझा छकुला, कमाल माझ्या बायकोची, गंमत जंमत, एक गाडी बाकी अनाडी अशा अनेक मराठी सुपरहिट चित्रपटांतून त्यांनी काम केलं आहे. तर सिंघम या हिंदी चित्रपटातदेखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांचं अचानक जाणं मराठी मनोरंजन सृष्टीला चटका लावून जाणारं आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत