Corruption case : पेण मधील सर्वात श्रीमंत डोलवी ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार

  156

आजी-माजी सरपंच व ग्रामसेवकांविरोधात गुन्हा दाखल; संजय जांभळे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा


पेण : पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रुप ग्राम पंचायत डोलवी मध्ये आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा जाहीर आरोप ग्राम पंचायतीच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी जिप सभापती संजय जांभळे यांनी केला आहे. संजय जांभळे यांनी सदर भ्रष्टाचार उघडकीस आणला असून, माजी सरपंच वनिता अनिल म्हात्रे, विद्यमान सरपंच परशुराम तुकाराम म्हात्रे आणि ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांच्या विरुध्द वडखळ पोलीस स्टेशन मध्ये कलम ४२०, ४०९, ४०६ प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत.


पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी सांगितले की, डोलवी ग्रामपंचायत मध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी पेण गट विकास अधिकारी यांना काही महिन्यांपूर्वी याबाबत गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. किरण पाटील यांच्या बदली नंतर विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनीही पुन्हा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पेणचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ हे त्यांच्या दबावाखाली येत त्यांनी त्यांचेही आदेश न मानल्याने शेवटी मलाच हायकोर्टात जाऊन दाद मागावी लागली. हायकोर्टाने दस्तऐवज बघितल्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढले. कोर्टाने तर पेण गटविकास अधिकारी यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिले. १ डिसेंबर २०२३ रोजी उच्च न्यायालयाकडून शासनाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढूण तातडीने कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानुसार रात्री उशिरा गटविकास अधिकारी भाउसाहेब पोळ यांनी वडखळ पोलीस ठाणे गाठत तत्कालीन सरपंच वनिता अनिल म्हात्रे, विद्यमान सरपंच परशुराम तुकाराम म्हात्रे आणि ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पेण गटविकास अधिकारी यांनी रात्री उशिरा भा.द.वी.कलम ४२०, ४०९, ४०६ आणि ३४ नुसार वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.


या पत्रकार परिषदवेळी संजय जांभळे यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य चंद्रकांत पाटील, रमाकांत पाटील, रामचंद्र देवजी म्हात्रे, अमृत म्हात्रे, भरत पाटील, अभय पाटील, लक्ष्मण पाटील, जे.बी.पाटील, गणेश बैकर, महेश माळी, कृष्णा कार्लेकर, संदीप पाटील, राजू पाटील, कृष्णा पाटील, नारायण जांभळे, दिनेश माळी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या