Corruption case : पेण मधील सर्वात श्रीमंत डोलवी ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार

आजी-माजी सरपंच व ग्रामसेवकांविरोधात गुन्हा दाखल; संजय जांभळे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा


पेण : पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रुप ग्राम पंचायत डोलवी मध्ये आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा जाहीर आरोप ग्राम पंचायतीच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी जिप सभापती संजय जांभळे यांनी केला आहे. संजय जांभळे यांनी सदर भ्रष्टाचार उघडकीस आणला असून, माजी सरपंच वनिता अनिल म्हात्रे, विद्यमान सरपंच परशुराम तुकाराम म्हात्रे आणि ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांच्या विरुध्द वडखळ पोलीस स्टेशन मध्ये कलम ४२०, ४०९, ४०६ प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत.


पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी सांगितले की, डोलवी ग्रामपंचायत मध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी पेण गट विकास अधिकारी यांना काही महिन्यांपूर्वी याबाबत गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. किरण पाटील यांच्या बदली नंतर विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनीही पुन्हा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पेणचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ हे त्यांच्या दबावाखाली येत त्यांनी त्यांचेही आदेश न मानल्याने शेवटी मलाच हायकोर्टात जाऊन दाद मागावी लागली. हायकोर्टाने दस्तऐवज बघितल्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढले. कोर्टाने तर पेण गटविकास अधिकारी यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिले. १ डिसेंबर २०२३ रोजी उच्च न्यायालयाकडून शासनाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढूण तातडीने कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानुसार रात्री उशिरा गटविकास अधिकारी भाउसाहेब पोळ यांनी वडखळ पोलीस ठाणे गाठत तत्कालीन सरपंच वनिता अनिल म्हात्रे, विद्यमान सरपंच परशुराम तुकाराम म्हात्रे आणि ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पेण गटविकास अधिकारी यांनी रात्री उशिरा भा.द.वी.कलम ४२०, ४०९, ४०६ आणि ३४ नुसार वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.


या पत्रकार परिषदवेळी संजय जांभळे यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य चंद्रकांत पाटील, रमाकांत पाटील, रामचंद्र देवजी म्हात्रे, अमृत म्हात्रे, भरत पाटील, अभय पाटील, लक्ष्मण पाटील, जे.बी.पाटील, गणेश बैकर, महेश माळी, कृष्णा कार्लेकर, संदीप पाटील, राजू पाटील, कृष्णा पाटील, नारायण जांभळे, दिनेश माळी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी