APY: मोदी सरकारच्या योजनेत ६ कोटी लोकांचा समावेश, मिळते ५००० पर्यंत पेन्शन

  83

नवी दिल्ली: सरकारचा सामाजिक सुरक्षा प्रमुख कार्यक्रम अटल पेन्शन योजना म्हणजेच एपीवायअंतर्गत नोंदणीकृत लोकांची संख्या ६ कोटीहून अधिक झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत या योजनेत ७९ लाख लोकांनी नोंदणी केली. अर्थ मंत्रालायाने ही माहिती दिली.


अटल पेन्शन योजना ९ मे २०१५मध्ये लाँच करण्यात आली होती. या योजनेचा हेतू देशातील नागरिक खासकरून गरीब, वंचित तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर इनकमची सुविधा उपलब्ध करून देणे.



कोण करू शकते गुंतवणूक


१८-४० वर्षापर्यंतचे लोक यात गुंतवणूक करू शकतात. वयाच्या ६० वर्षानंतर त्या व्यक्तीच्या योगदानाच्या आधारावर १००० ते ५००० पर्यंत मासिक पेन्शनची गॅरंटी दिली जाते. तर सबस्क्रायबरचा मृत्यू होत असेल तर ही पेन्शनची रक्कम त्याच्या साथीदाराला दिली जाते.



दररोज ७ रूपयांची बचत देऊ शकते महिन्याला ५००० पेन्शन


जर एखादी व्यक्ती १८ वर्षांची आहे आणि तिला वयाच्या ६०नंतर ५००० रूपयांची पेन्शन मिळवायची आहे तर त्या व्यक्तीला दर महिन्याला २१० रूपये जमा करावे लागतील.

Comments
Add Comment

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग