APY: मोदी सरकारच्या योजनेत ६ कोटी लोकांचा समावेश, मिळते ५००० पर्यंत पेन्शन

नवी दिल्ली: सरकारचा सामाजिक सुरक्षा प्रमुख कार्यक्रम अटल पेन्शन योजना म्हणजेच एपीवायअंतर्गत नोंदणीकृत लोकांची संख्या ६ कोटीहून अधिक झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत या योजनेत ७९ लाख लोकांनी नोंदणी केली. अर्थ मंत्रालायाने ही माहिती दिली.


अटल पेन्शन योजना ९ मे २०१५मध्ये लाँच करण्यात आली होती. या योजनेचा हेतू देशातील नागरिक खासकरून गरीब, वंचित तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर इनकमची सुविधा उपलब्ध करून देणे.



कोण करू शकते गुंतवणूक


१८-४० वर्षापर्यंतचे लोक यात गुंतवणूक करू शकतात. वयाच्या ६० वर्षानंतर त्या व्यक्तीच्या योगदानाच्या आधारावर १००० ते ५००० पर्यंत मासिक पेन्शनची गॅरंटी दिली जाते. तर सबस्क्रायबरचा मृत्यू होत असेल तर ही पेन्शनची रक्कम त्याच्या साथीदाराला दिली जाते.



दररोज ७ रूपयांची बचत देऊ शकते महिन्याला ५००० पेन्शन


जर एखादी व्यक्ती १८ वर्षांची आहे आणि तिला वयाच्या ६०नंतर ५००० रूपयांची पेन्शन मिळवायची आहे तर त्या व्यक्तीला दर महिन्याला २१० रूपये जमा करावे लागतील.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला