Sharad Pawar : जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधीच शरद पवारांच्या वक्तव्यामुळे महाआघाडीत मिठाचा खडा!

नाशिक लोकसभा मतदारसंघ कुणाकडे?


मुंबई : दिल्ली येथे १९ तारखेला होणा-या इंडिया आघाडीच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाआघाडीत मिठाचा खडा पडला आहे. पवारांच्या या विधानाने महाआघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.


नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडल्याच्या ठाकरे गटाचा दावा पवारांनी खोडला आहे. याआधी नाशिक लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून लढवला जाईल, असा दावा करण्यात आला होता. हा दावा शरद पवारांनी खोडला आहे.


ठाकरे गटाचे उपनेते सुनिल बागुल म्हणाले होते की, शरद पवार यांनी नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचा दावा खोडून काढला आहे. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते. गोडसे हे शिंदे गटातील नेते आहेत.

Comments
Add Comment

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५