मुंबई : दिल्ली येथे १९ तारखेला होणा-या इंडिया आघाडीच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाआघाडीत मिठाचा खडा पडला आहे. पवारांच्या या विधानाने महाआघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडल्याच्या ठाकरे गटाचा दावा पवारांनी खोडला आहे. याआधी नाशिक लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडून लढवला जाईल, असा दावा करण्यात आला होता. हा दावा शरद पवारांनी खोडला आहे.
ठाकरे गटाचे उपनेते सुनिल बागुल म्हणाले होते की, शरद पवार यांनी नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचा दावा खोडून काढला आहे. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते. गोडसे हे शिंदे गटातील नेते आहेत.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…