Karnataka government : कर्नाटकातही होणार महाराष्ट्रासारखे पक्षांतर; ५० ते ६० आमदार भाजपाच्या वाटेवर

  87

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मोठा दावा


बंगळुरू : जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी (Kumaraswamy) यांनी सत्ताधारी काँग्रेस (Congress) पक्षातले ५० ते ६० आमदार फुटून भाजपात जाऊ शकतात आणि महाराष्ट्रात घडलं तसं सत्ता परिवर्तन कर्नाटकात (Karnataka) घडू शकतं असा दावा केला आहे. काँग्रेस पक्षातले एक प्रभावशाली मंत्री आहेत ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचायचं आहे. त्यामुळे ते आणि त्यांच्यासह ५० ते ६० आमदार हे भाजपात जातील असा दावा केला आहे. सध्या त्या बड्या नेत्याची भाजपाशी चर्चा सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं.


देशातील ५ राज्यातील विधानसभा निवडणूक निकालात भाजपाने घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे, आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकांसाठी भाजपाचा आत्मविश्वास वाढला असून भाजप अत्यंत जोमाने तयारी करत आहे. तेलंगणा राज्यातही काँग्रेसचा विजय झाला असला तरी अगदी एक जागा हाती असलेल्या भाजपने या निवडणुकीत तेलंगणाच्या आठ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे येत्या काळात तेलंगणातही भाजपचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे.


काही महिन्यांपूर्वी कर्नाटक राज्यही भाजपला गमवावं लागलं होतं. मात्र, कर्नाटकमधील काँग्रेस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये मंत्री असलेला एक काँग्रेस नेता ५० ते ६० आमदारांसह लवकरच भाजपात प्रवेश करेल. कदाचित लवकरच कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कोसळेल, काहीही घडू शकतं. असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. कोणाच्याचही प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठपणा राहिलेला नाही, असेही ते म्हणाले.



मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातही अशीच स्थापन झाली भाजपची सत्ता


मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपनेआश्चर्यकारक सरकार स्थापन केलं होतं. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिर्रादित्य शिंदेंना आपल्या पक्षात घेत भाजपाने तेथील काँग्रेसचं सरकार पाडलं. तसेच, महाराष्ट्रातही शिवसेनेत मोठा बंड झाला आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० ते ५० आमदारांनी भाजपासोबत महायुती करुन सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता, भाजपने कर्नाटकातही तोच फॉर्म्युला अवलंबण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे.

Comments
Add Comment

पंजाबमध्ये पुराचा हाहाकार, नवोदय विद्यालयात ४०० मुले अडकली; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संताप

गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून

जर्मन वृत्तपत्राचा मोठा दावा: ट्रम्प यांचे ४ फोन, पण पंतप्रधान मोदींनी प्रतिसाद दिला नाही

नवी दिल्ली: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार तणावादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. जर्मन

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस