IND vs PAK: आशिया चषकात पाकिस्तानकडून भारताचा पराभव

मुंबई: दुबईत सुरू असलेल्या अंडर १९ आशिया चषकात(u19 asia cup) भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा युवा संघ पाकिस्तानकडून ८ विकेटनी पराभूत झाला. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ९ बाद २५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या संघाने केवळ दोन विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले. पाकिस्तानसाठी मोहम्मद जीशानने धारदार गोलंदाजी केली आणि अजान अवैसने शानदार शतक ठोकले.


ग्रुप एमधील या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीची जोडीची सुरूवात संथ आणि सावध झाली. ९व्या ओव्हरमध्ये ३९ धावांवर भारताला पहिला झटका बसला. अशिन कुलकर्णीला २४ धावांवर अमीन हसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर रुद्र पटेलही १ धावेवर बाद झाला. त्याला मोहम्मद जीशानने बाद केले.


आदर्श सिंह आणि कर्णधार उदय शरणने तिसऱ्या विकेटसाठी १२० बॉलमध्ये ९३ धावा केल्या. भारतीय संघ यावेळी चांगल्या स्थितीत होता. मात्र आदर्श सिंह ६२ धावांवर परतला. त्यानंतर एकामागोमाग विकेट पडत गेले.



भारताच्या तीन फलंदाजांनी ठोकली अर्धशतके


यानंतर कर्णधार उदय शरणने सचिन धाससोबत मिळून ४८ धावा करताना संघाला २०० पार पोहोचवले. एकूण २०६ धावा झाल्या असताना तो ६० धावा करू बाग झाला. दुसऱ्या बाजूने विकेट पडतच होत्या. मुरूगन अभिषेकने ४ तर राज लिंबानीने ७ धावा केल्या. भारतीय संघाला ५० षटकांत ९ बाद २५९ धावा केल्या. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद जीशानने १० षटकांत ४६ धावा देत ४ विकेट मिळवल्या.



अजान अवैसचे शतक


२६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. २८ धावांवर पाकिस्तानचा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी झाली. त्यानंतर १३८ धावांवर त्यांची दुसरी विकेट पडली. मात्र त्यानंतर अजानने कर्णधार साद बैगसोबत १२५ धावांची नाबाद भागीदारी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

Comments
Add Comment

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत