Aditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे अडचणीत; एसआयटी करणार चौकशी

केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक आमदारांनी केले होते गंभीर आरोप 


मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) वारंवार ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत असलेल्या दिशा सालियनच्या हत्या प्रकरणात (Disha Salian Murder case) आदित्य ठाकरे आता चांगलेच अडचणीत सापडणार आहेत. राज्य सरकार (Maharashtra Government) आदित्य ठाकरेंची एसआयटी (SIT) चौकशी करणार आहे. सुजाता सौनिक एसआयटीसंदर्भात आजच चौकशीची ऑर्डर काढणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना आता चौकशीला सामोरं जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.


मागील काही दिवसांत दिशा सालियन हत्या प्रकरण फारच ढवळून निघालं आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह अनेक आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्याने उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.


केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणालेले की, सुशांत सिंह आणि दिशा सालियनचं नाव आलं की, आदित्य ठाकरे चवताळतात. दिशा सालियन या एका भारतीय, महाराष्ट्रीय मुलीवर अत्याचार केला आहे, तिची हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथे उपस्थित होते. त्यामुळे त्यांना सोडणार नाही. आता सत्ता भाजप आणि शिवसेनेची आहे हे लक्षात ठेवा, असंही नारायण राणे म्हणाले होते. तसेच आमदार नितेश राणे देखील सातत्याने आदित्य ठाकरेंवर आरोप करत असतात. त्यामुळे सरकारने याची गंभीरपणे दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.



राहुल कनाल यांनीही केली होती मागणी


आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा राहुल कनाल यांनी दिशा सालियन प्रकरणाची कारवाई टाळावी, म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याची टीका होत होती. या टीकेला उत्तर देताना राहुल कनाल यांनी पहिला घाव आदित्य ठाकरेंवरच घातला. या प्रकरणी पुन्हा फाईल ओपन करुन सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा