Nitesh Rane : उबाठा हा पक्ष आहे की पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी?

आधी तुमच्या उबाठामध्ये संविधान आणि लोकशाही आणा


आमदार नितेश राणे यांनी घेतला उबाठाचा समाचार


मुंबई : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections) काँग्रेसला (Congress) केवळ एका राज्यात विजय मिळवता आला. तर इतर तीन राज्यांमध्ये भाजपचा (BJP) दणदणीत विजय झाला. यावर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सोयीस्कररित्या ईव्हीएमवर शंका घेत आहेत. त्यांच्या या शंकेला भाजपच्या अधिकृत अकाऊंटवरुन चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील ठाकरे व राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.


नितेश राणे म्हणाले, चार राज्यांचे निकाल लागले आणि तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं. यानंतर लगेच उद्धव ठाकरे आणि त्यांचा कामगार संजय राऊत एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असा आग्रह करायला लागले. मग हाच आग्रह कर्नाटकच्या निवडणुकीनंतर का केला नाही? मातोश्रीची मम्मी रागावेल म्हणून? मग २०१४ आणि २०१९ मध्ये दोन्ही निवडणुकांमध्ये जेव्हा मोदीसाहेबांच्या आशीर्वादामुळे तुमचे १८-१८ खासदार निवडून आले तेव्हा बॅलेट पेपर आठवला नाही का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


संविधानाच्या एवढ्या गप्पा मारता मग तुमच्या उबाठामध्ये तरी संविधान आहे का? संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरंच हिंमत असेल तर दोघांनीही आपल्या विधानपरिषद आणि राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून येऊन दाखवावं. संविधानाच्या गप्पा मारता मग आम्ही जे ऐकतोय की मुंबई पदवीधर निवडणुकीचा उमेदवार हा तो सरकारी भाचाच आहे, मग तेव्हा तुम्हाला सामान्य शिवसैनिक आधी आठवत नाहीत का? असा जळजळीत सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


उबाठा हा पक्ष आहे की पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे याचं पहिलं उत्तर द्या. देशामध्ये संविधान आहे की नाही हे विचारण्याअगोदर आधी तुमच्या उबाठामध्ये संविधान आणि लोकशाही आणा आणि मग दुसर्‍यांना सल्ले द्या, असे खडे बोल नितेश राणे यांनी सुनावले.

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ