Nitesh Rane : उबाठा हा पक्ष आहे की पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी?

  414

आधी तुमच्या उबाठामध्ये संविधान आणि लोकशाही आणा


आमदार नितेश राणे यांनी घेतला उबाठाचा समाचार


मुंबई : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections) काँग्रेसला (Congress) केवळ एका राज्यात विजय मिळवता आला. तर इतर तीन राज्यांमध्ये भाजपचा (BJP) दणदणीत विजय झाला. यावर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सोयीस्कररित्या ईव्हीएमवर शंका घेत आहेत. त्यांच्या या शंकेला भाजपच्या अधिकृत अकाऊंटवरुन चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील ठाकरे व राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.


नितेश राणे म्हणाले, चार राज्यांचे निकाल लागले आणि तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं. यानंतर लगेच उद्धव ठाकरे आणि त्यांचा कामगार संजय राऊत एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असा आग्रह करायला लागले. मग हाच आग्रह कर्नाटकच्या निवडणुकीनंतर का केला नाही? मातोश्रीची मम्मी रागावेल म्हणून? मग २०१४ आणि २०१९ मध्ये दोन्ही निवडणुकांमध्ये जेव्हा मोदीसाहेबांच्या आशीर्वादामुळे तुमचे १८-१८ खासदार निवडून आले तेव्हा बॅलेट पेपर आठवला नाही का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


संविधानाच्या एवढ्या गप्पा मारता मग तुमच्या उबाठामध्ये तरी संविधान आहे का? संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरंच हिंमत असेल तर दोघांनीही आपल्या विधानपरिषद आणि राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून येऊन दाखवावं. संविधानाच्या गप्पा मारता मग आम्ही जे ऐकतोय की मुंबई पदवीधर निवडणुकीचा उमेदवार हा तो सरकारी भाचाच आहे, मग तेव्हा तुम्हाला सामान्य शिवसैनिक आधी आठवत नाहीत का? असा जळजळीत सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


उबाठा हा पक्ष आहे की पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे याचं पहिलं उत्तर द्या. देशामध्ये संविधान आहे की नाही हे विचारण्याअगोदर आधी तुमच्या उबाठामध्ये संविधान आणि लोकशाही आणा आणि मग दुसर्‍यांना सल्ले द्या, असे खडे बोल नितेश राणे यांनी सुनावले.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.