michaung cyclone: बंगालच्या खाडीमध्ये वाढतेय मिचाँग चक्रीवादळाची ताकद, भारत सरकारने उचलले हे पाऊल

नवी दिल्ली: कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीची आज बैठक झाली. यात बंगालच्या खाडीमध्ये येणारे चक्रीवादळ मिचौंगसाठी(michaung cyclone) राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या तयारींची पाहणी करण्यात आली. भारतीय हवामान विज्ञान विभागाच्या संचालकांनी मायचोंगच्या वर्तमानाच्या स्थितीबाबत माहिती दिली.


दक्षिण-पूर्व आणि त्याच्या जवळील दक्षिण-पश्चिमी बंगालच्या खाडीवर दबाव गेल्या ६ तासादरम्यान १३ किमी प्रति तास गतीने पश्चिम-उत्तर-पश्चिमेच्या दिशेने वाढत आहे.येत्या २ तारखेपर्यंत याचा दबाव अधिक वाढण्याची शक्यता आहे तसेच ३ डिसेंबरच्या जवळपास बंगालच्या दक्षिण-पश्चिम खाडीवर चक्रवाती वादळात रूपांतर होम्याची शक्यता आहे. याशिवाय हे उत्तर-पश्चिमेच्या दिशेने वाढेल आणि ४ डिसेंबरला दुपारपर्यंत दक्षिण आंध्र प्रदेश आणि आसपासच्या उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पोहोचेल.


यानंतर येथे दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर समांतर उत्तरेच्या दिशेने वाढेल आणि ५ डिसेंबरच्या सकाळी नेल्लोर आणि मछलीपट्टनम यादरम्यान एक चक्रवाती वादळाच्या रूपात दक्षिण आंध्र प्रदेशाला पार करेल. यात हवेची गती ८०-९० किमी प्रति तासापासून ते १०० किमी प्रती तासापर्यंत पोहोचू शकते.


तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशाचे मुख्य सचिव आणि पाँडिचेरीच्या अर्थ सचिवांनी समितीला चक्रीवादाळाचा अपेक्षित मार्गात जनता तसेच संपत्तीच्या सुरक्षेसाठी केले जाणारे प्राथमिक उपाय आणि स्थानीय प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.



मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला


मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुरेसे आश्रय स्थळे, वीजपुरवठा, औषधे आणि आपात्कालीन सेवा तयार ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पाँडिचेरी येथे १८ टीम उपलब्ध केल्या आहेत. तसेच १० अतिरिक्ट टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक

गॅस सिलिंडरच्या मागणीत २० ते २२ लाखांनी वाढ

नवी दिल्ली : गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक

मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास नकार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे.

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम