Maratha Reservation : तेव्हा मुख्यमंत्री आणि नेते झोपले होते!

मराठा आरक्षणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे खळबळजनक वक्तव्य


जळगाव : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी विरोधकांवर आरोप करताना तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कधीही विचार केला नाही, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. तसेच सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा विचार केला. देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीस यांनी कायदा केला. पण या नतद्रष्टांनी मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे, हे मांडण्याची पद्धत चुकवली. जेव्हा ही केस अंतिम टप्प्यात होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नेते झोपी गेले होते, अशा कठोर शब्दात बावनकुळे यांनी टीका केली.


मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकार प्रयत्नशील आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये