रत्नागिरी : राज्यात महायुती सरकार आल्यापासून ते राज्यासोबतच कोकणचा विकास (Konkan development) करण्यासाठीही नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत. कोकणात अनेकविध प्रकल्प आणून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रत्नागिरीत (Ratnagiri) देखील एक नवा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. मंत्री उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कोकण दौरा (Konkan Visit) नियोजित आहे. ते आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना भेट देणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून हा त्यांचा चौथा कोकण दौरा आहे. या दरम्यानच रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु होणार्या कोका-कोला प्रकल्पाचे (Coca cola project) त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित राहणार आहेत.
या प्रकल्पासंदर्भात प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, या जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असा शब्द मी जिल्हावासियांना दिला होता. त्याच माध्यमातून सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करुन हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सातशे कोटी गुंतवण्यात आले आहेत, त्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री महोदय करणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे एक वेगळी आर्थिक उलाढाल चिपळूण परिसरात होऊ शकते आणि स्थानिकांना रोजगार मिळू शकतो, एवढ्या ताकदीचा हा प्रकल्प आहे, असं उदय सामंत म्हणाले.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…