Konkan development : साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळवून देणारा कोका-कोला प्रकल्प रत्नागिरीत

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन


रत्नागिरी : राज्यात महायुती सरकार आल्यापासून ते राज्यासोबतच कोकणचा विकास (Konkan development) करण्यासाठीही नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत. कोकणात अनेकविध प्रकल्प आणून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रत्नागिरीत (Ratnagiri) देखील एक नवा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. मंत्री उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी याबद्दल माहिती दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कोकण दौरा (Konkan Visit) नियोजित आहे. ते आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना भेट देणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून हा त्यांचा चौथा कोकण दौरा आहे. या दरम्यानच रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु होणार्‍या कोका-कोला प्रकल्पाचे (Coca cola project) त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित राहणार आहेत.


या प्रकल्पासंदर्भात प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, या जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असा शब्द मी जिल्हावासियांना दिला होता. त्याच माध्यमातून सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करुन हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सातशे कोटी गुंतवण्यात आले आहेत, त्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री महोदय करणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे एक वेगळी आर्थिक उलाढाल चिपळूण परिसरात होऊ शकते आणि स्थानिकांना रोजगार मिळू शकतो, एवढ्या ताकदीचा हा प्रकल्प आहे, असं उदय सामंत म्हणाले.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात