Salt: रोज आपल्या डाएटमध्ये खा फक्त इतकं मीठ आणि बघा कमाल

मुंबई: मीठ हे आपल्या जीवनासाठी गरजेचे आहे. मात्र त्याचे गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास आपल्याला काही आजारांचा सामना करावा लागू शकोतो. मीठाचा सर्वाधिक परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. मीठामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम आहे. सोडियम आपल्या शरीरात फ्लूड बॅलन्स करण्याचे काम करते. यामुळे मसल्स आणि नर्व्ह काम करतात.


जेव्हा शरीरात सोडियम कमी होते तेव्हा किडनी पाणी धरून ठेवते मात्र जेव्हा सोडियम जास्त असते तेव्हा किडनी मूत्राच्या स्वरूपात बाहेर काढते. मात्र प्रमाणापेक्षा जास्त सोडियम झाल्यास किडनी हे अधिकच सोडियमचा निचरा करण्यास अयशस्वी ठरते. यामुळे सोडियम रक्तात जमा होऊ लागते आणि हे पाणी रोखण्यास सुरूवात करते.


यामुळे रक्ताचा व्हॉल्यूम वाढू लागतो आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात. यामुळे आर्टरीमध्ये दाब निर्माण होऊन अनेक प्रकारचे हृदयाचे आजार तसेच किडनीचे आजार होतात. यासाठी नुकत्यात करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोजच्या जगण्यात तुम्ही जर दररोज एक चमचा मीठ कमी केल्यास हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना औषधे खाल्ल्याने जितका लाभ मिळत आहे त्यापेक्षा अधिक लाभ मिळेल.



मध्यम वयाचे लोक खातात जास्त मीठ


दररोज एक चमचा मीठ कमी खाल्ल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल घडतात. यामुळे हाय ब्लड प्रेशरचे औषध खाल्ल्याने जितका फायदा मिळतो तितका मिळतो तसेच अन्य आजारांची लक्षणेही कमी होतात. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहेच मात्र ज्यांना हा त्रास नाही आहे त्यांनाही हे फायदेशीर आहे.



किती मीठ आहे गरजेचे


जागतिक आरोग्य संघटनेनुसार एका वयस्कर व्यक्तीने दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठाचे सेवन केले पाहिजे. यात २ ग्रॅम सोडियम आणि ३.५ ग्रॅम पोटॅशियम असले पाहिजे. मात्र जगभरातील अधिकांश लोक ९ ते १२ टक्के मीठाचे सेवन करतात. आजकाल जितके प्रोसेस्ड फूड जसे पिझ्झा, बर्गरमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असते. यामुळे आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Dabbawala Tourist Centre : चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील डब्यांच्या देवाण-घेवाणीचे ऐतिहासिक स्थळ मुंबई डबेवाला पर्यटक केंद्र बनवा

डबेवाला संघटनेची मुंबई महापालिकेकडे मोठी मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील (Churchgate Railway

Government Decision : आजपासून 'ऑर्केस्ट्रा बार'चे परवाने बंद!

गृह विभागाचा निर्णय; जुन्या परवान्यांचे नूतनीकरणही थांबवले मुंबई : हॉटेल, उपाहारगृहे आणि बारमधील अश्लील

Traffic Congestion : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी,तीन प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांच्या

Water Cut Mumbai : येत्या मंगळवारी आणि बुधवारी संपूर्ण मुंबईतील काही भागांमध्ये तांत्रिक पाणीकपात

आधीच १० टक्के पाणीकपात, त्यात आणखी १५ टक्के कपातीचा सामना करावा लागणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात

Nitesh Rane: ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांचा नितेश राणेंकडून आढावा

मुंबई: मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या