आधीच १० टक्के पाणीकपात, त्यात आणखी १५ टक्के कपातीचा सामना करावा लागणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत (BMC Water Supply) पांजरापूर येथील मुंबई - ३ अ उदंचन केंद्रातील विद्यमान ६.६ के.व्ही. उच्च दाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, मंगळवारी २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते बुधवारी २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या २० तासांच्या कालावधीत भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पांजरापूर येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही भागास पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात होऊ शकते. नागरिकांनी याची दखल घेऊन सहकार्य करावे, असे नम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात असले तरी आधीच दहा टक्के त्यात या दोन दिवसांमध्ये १५ टक्के अशाप्रकारे तब्बल २५ टक्के कपातीचा सामना करावा लागणार आहे. (Mumbai Water Cut)
दोन वर्षांसाठी मोजणार १४.४६ कोटींचा खर्च मुंबई : मुंबईतील (Mumbai) पश्चिम उपनगरातील एकुण ०६ ठिकाणांवर नदी, नाल्यांमधील जमा होणारा तरंगता कचरा काढण्यासाठी ...
पांजरापूर येथील मुंबई - ३ अ उदंचन केंद्रातील ६.६ के.व्ही. उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे नियोजन आहे. या अंतर्गत विद्यमान १० जुन्या उच्चदाब नियंत्रण पॅनेलच्या जागी अत्याधुनिक व कार्यक्षम अशा १० नवीन उच्च दाब नियंत्रण पॅनेलची स्थापना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्या अंतर्गत एकूण १० उच्चदाब कंट्रोल पॅनलपैकी ४ उच्चदाब कंट्रोल पॅनल प्रथम बदलण्यात येणार आहेत. हे काम मंगळवारी २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते बुधवारी २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ‘मुंबई ३ अ उदंचन केंद्र’ सुमारे २० तास बंद ठेवणे अपरिहार्य आहे. (Mumbai)
परिणामी, येत्या २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते दिनांक २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत या २० तासांच्या कालावधीत भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पांजरापूर येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही ठिकाणच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात होऊ शकते. (Water Shortage)