Election Commission: सिद्धरमैया सरकारला निवडणूक आयोगाची नोटीस, तेलंगणामध्ये छापले होते कर्नाटक सरकारच्या जाहिराती

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने(election commission) सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातील कर्नाटक सरकारला(karnataka government) नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी तेलंगणामध्ये सरकारी जाहिरात देत आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे याबाबत नोटीस जाहीर केली आहे.


निवडणूक पॅनेलने भारतीय जनता पार्टी आणि तेलंगणातील सत्तारूढ पक्ष भारत राष्ट्र समितीने सांगितले होते की कर्नाटक सरकारने अनेक न्यूजपेपरच्या हैदराबाद एडिशनमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती.



याला नव्हती दिली मंजुरी


हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टमध्ये सांगितले गेले की निवडणूक आयोगाने सांगितले की त्यांनी आपल्या रेकॉर्डचा तपास केला आणि यादरम्यान आढळले की यासाठी ना काँग्रेसला मंजुरी दिली होती ना कर्नाटक सरकारचा असा काही अर्ज निर्णयासाठी प्रलंबित आहे.



आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन


निवडणूक आयोगाने नोटिफिकेशनमध्ये म्हटले की, कर्नाटक सरकारने निवडणूक राज्य तेलंगणामध्ये प्रसारित होणाऱ्या वर्तमानपत्रांमध्ये सरकारच्या कल्याणकारी योजना तसेच मिळवलेल्या यशाबद्दल जाहिराती दिल्या आहे. मात्र असे करणे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन आहे.



निवडणूक आयोगाने मागितले उत्तर


निवडणूक आयोगाने या प्रकरणात कर्नाटक सरकारला २८ नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. सोबतच निवडणूक आयोगाने सिद्धरमैया सरकारच्या तेलंगणामध्ये अशा प्रकारच्या जाहिरातींच्या प्रसिद्धी तातडीने रोखण्याचे आदेश दिले आहेत.


तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर याचे निकाल ३ डिसेंबरला घोषित केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई

गंभीर जखमींना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, सरकारचा मोठा निर्णय कर्नाटक : भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास

'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करुन अनेक निरपराध

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक