Murder: किरकोळ वादातून तरुणाची हत्या, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

सिडको (प्रतिनिधी)- किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून १६ वर्षीय मुलाचे एका वाहनातून अपहरण करण्यात आले होते. यावेळी त्यास मारहाण करत असताना त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी अंबड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार २४ नोव्हेंबरला मृत राजा गब्बर सिंग याचे संशयितांबरोबर किरकोळ भांडण झाले होते. याचा राग मनात धरून २५ नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत राजा सिंग यास अंबड गाव बसं स्थानक येथून अपहरण करीत त्यास एका खडी क्रेशर येथे नेऊन मारहाण करण्यात आली होती.

ही मारहाण करीत असतांना राजा गब्बर सिंग याचा मृत्यू झाला.तो मृत झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास संशयतांनी वाडीव-हे परिसरानजीक एका हॉटेल नजीक नेऊन फेकून दिले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास याच भागात गायी चारणा-या गुराख्यास मृत राजा सिंग दिसल्याने वाडीवऱ्हे पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. या प्रकरणी त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.


मात्र राजा सिंग याचे वडील गब्बर सिंग यांनी अंबड पोलिसात अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. याबाबत चौकशी करताना अंबड पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदराने दिलेल्या माहिती नुसार मयत राजा सिंग याचे अपहरण करण्यात आले होते. यातील संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी केलेला मारहाणीत राजा सिंग याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरा पर्यत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,