Murder: किरकोळ वादातून तरुणाची हत्या, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

सिडको (प्रतिनिधी)- किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून १६ वर्षीय मुलाचे एका वाहनातून अपहरण करण्यात आले होते. यावेळी त्यास मारहाण करत असताना त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी अंबड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार २४ नोव्हेंबरला मृत राजा गब्बर सिंग याचे संशयितांबरोबर किरकोळ भांडण झाले होते. याचा राग मनात धरून २५ नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत राजा सिंग यास अंबड गाव बसं स्थानक येथून अपहरण करीत त्यास एका खडी क्रेशर येथे नेऊन मारहाण करण्यात आली होती.

ही मारहाण करीत असतांना राजा गब्बर सिंग याचा मृत्यू झाला.तो मृत झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास संशयतांनी वाडीव-हे परिसरानजीक एका हॉटेल नजीक नेऊन फेकून दिले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास याच भागात गायी चारणा-या गुराख्यास मृत राजा सिंग दिसल्याने वाडीवऱ्हे पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. या प्रकरणी त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.


मात्र राजा सिंग याचे वडील गब्बर सिंग यांनी अंबड पोलिसात अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. याबाबत चौकशी करताना अंबड पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदराने दिलेल्या माहिती नुसार मयत राजा सिंग याचे अपहरण करण्यात आले होते. यातील संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी केलेला मारहाणीत राजा सिंग याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरा पर्यत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात