Mumbai Goa Highway accident : भीषण अपघात! गाडीवरील ताबा सुटला आणि शेड व रॅम्प झाले जमीनदोस्त!

दोन युवती गंभीर जखमी


नांदगाव : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) नांदगाव दत्तमंदिर येथे चारचाकी मारुती स्विफ्ट कार (Maruti Swift car) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीने प्रवासी निवारा शेड, रॅम्प जमीनदोस्त करून टाकली. यामध्ये शेडमधील दोन महाविद्यालयीन युवती जखमी झाल्या. एका युवतीचे दोन्ही पाय जायबंदी होऊन गंभीर दुखापत झाली. ही घटना सकाळी ८:३० च्या सुमारास घडली.


याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरीहून गोव्याकडे जाणारा चारचाकी चालक निनाद सुभाष शिरदनकर (रत्नागिरी) नांदगाव दत्तमंदिर पाटील वाडी जवळ आला असता वाहनावरील ताबा सुटला आणि भयंकर वेगाने लगतच्या निवारा शेडला धडक देऊन त्यापुढील लोखंडी रॅम्प तोडून रस्त्यावर पलटी झाला.


यावेळी शेडमध्ये दोन महाविद्यालयीन युवती कणकवली येथे महाविद्यालयात जाण्यासाठी थांबल्या होत्या.या अपघातात प्रेरणा राजेंद्र तांबे (वय १८ वर्षे) गंभीर जखमी असून तिचे दोन्ही पाय जायबंदी असल्याचे सांगितले गेले. तिला उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरी युवती व चालक किरकोळ जखमी झाले. अधिक तपास कणकवली पोलीस करत असून पोलिस चंद्रकांत माने घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या