Mumbai Goa Highway accident : भीषण अपघात! गाडीवरील ताबा सुटला आणि शेड व रॅम्प झाले जमीनदोस्त!

दोन युवती गंभीर जखमी


नांदगाव : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) नांदगाव दत्तमंदिर येथे चारचाकी मारुती स्विफ्ट कार (Maruti Swift car) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीने प्रवासी निवारा शेड, रॅम्प जमीनदोस्त करून टाकली. यामध्ये शेडमधील दोन महाविद्यालयीन युवती जखमी झाल्या. एका युवतीचे दोन्ही पाय जायबंदी होऊन गंभीर दुखापत झाली. ही घटना सकाळी ८:३० च्या सुमारास घडली.


याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरीहून गोव्याकडे जाणारा चारचाकी चालक निनाद सुभाष शिरदनकर (रत्नागिरी) नांदगाव दत्तमंदिर पाटील वाडी जवळ आला असता वाहनावरील ताबा सुटला आणि भयंकर वेगाने लगतच्या निवारा शेडला धडक देऊन त्यापुढील लोखंडी रॅम्प तोडून रस्त्यावर पलटी झाला.


यावेळी शेडमध्ये दोन महाविद्यालयीन युवती कणकवली येथे महाविद्यालयात जाण्यासाठी थांबल्या होत्या.या अपघातात प्रेरणा राजेंद्र तांबे (वय १८ वर्षे) गंभीर जखमी असून तिचे दोन्ही पाय जायबंदी असल्याचे सांगितले गेले. तिला उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरी युवती व चालक किरकोळ जखमी झाले. अधिक तपास कणकवली पोलीस करत असून पोलिस चंद्रकांत माने घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते.

Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले