Mumbai Goa Highway accident : भीषण अपघात! गाडीवरील ताबा सुटला आणि शेड व रॅम्प झाले जमीनदोस्त!

  312

दोन युवती गंभीर जखमी


नांदगाव : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) नांदगाव दत्तमंदिर येथे चारचाकी मारुती स्विफ्ट कार (Maruti Swift car) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीने प्रवासी निवारा शेड, रॅम्प जमीनदोस्त करून टाकली. यामध्ये शेडमधील दोन महाविद्यालयीन युवती जखमी झाल्या. एका युवतीचे दोन्ही पाय जायबंदी होऊन गंभीर दुखापत झाली. ही घटना सकाळी ८:३० च्या सुमारास घडली.


याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरीहून गोव्याकडे जाणारा चारचाकी चालक निनाद सुभाष शिरदनकर (रत्नागिरी) नांदगाव दत्तमंदिर पाटील वाडी जवळ आला असता वाहनावरील ताबा सुटला आणि भयंकर वेगाने लगतच्या निवारा शेडला धडक देऊन त्यापुढील लोखंडी रॅम्प तोडून रस्त्यावर पलटी झाला.


यावेळी शेडमध्ये दोन महाविद्यालयीन युवती कणकवली येथे महाविद्यालयात जाण्यासाठी थांबल्या होत्या.या अपघातात प्रेरणा राजेंद्र तांबे (वय १८ वर्षे) गंभीर जखमी असून तिचे दोन्ही पाय जायबंदी असल्याचे सांगितले गेले. तिला उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरी युवती व चालक किरकोळ जखमी झाले. अधिक तपास कणकवली पोलीस करत असून पोलिस चंद्रकांत माने घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग कामात दिरंगाई व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही

खासदार नारायण राणे यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ठेकेदार गांभीर्याने

मंत्री नितेश राणेंनी घेतली वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती

कुडाळ प्रतिनिधी : मंत्री नितेश राणेंनी कुडाळच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला

Mumbai-Goa highway : कशेडी घाटात भेगा, नव्या मुंबई-गोवा महामार्गावर भूस्खलनाचा धोका वाढला

पोलादपूर : जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील कशेडी घाटात भेगा पडल्याने आणि मंगळवारी सायंकाळी

दापोली-खेड रस्ता बंद! जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा

खेड : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्याचा परिणाम दापोली-खेड प्रमुख राज्य मार्गावर दिसून

Gas Tanker Overturned: ताम्हिणी घाटात विषारी गॅसचा टँकर पलटला

पुणे दिघी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प माणगांव: पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या डोंगरवाडी गावच्या

देवगडमध्ये मासेमारीला ‘ब्रेक’

खोल समुद्रात न जाण्याचे मच्छीमारांना आवाहन देवगड : मॉन्सूनपूर्व पावसाने किनारी भागाला चांगलेच झोडपल्याने