Fungus disease : तुरीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी पुन्हा चिंतेत

रब्बी हंगामात करावा लागणार अवकाळीचा सामना


बुलढाणा : अनियमित पाऊस (Irregular Rain) आणि बदलते खराब हवामान (Bad weather) याचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे निदान रब्बी हंगामात (Rabi Season) चांगली पिके होतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, खराब हवामानामुळे रब्बी हंगामातील तुरीच्या पिकावर 'फायटोप्थोरा ब्लाईट' (Phytophthora blight) या बुरशीजन्य रोगाचा (Fungus disease) प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील सहा लाख हेक्टरवरील तुरीचं पीक धोक्यात आलं आहे.


खरीप हंगामाच्या वेळी राज्यांत अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक भागांत कमी पाऊस पडल्याने खरीप पिके झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता थोडीफार तुरीच्या पिकाची अपेक्षा होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तुरीचं पीक हिरवेगार होतं. मात्र, याही पिकांवर बदलत्या वातावरणामुळे 'फायटोप्थोरा ब्लाईट' या बुरशीजन्य रोगानं शिरकाव केला आहे. आता हिरवंगार तुरीचं पीक पिवळं पडून सुकू लागलं आहे.


राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. पण या रोगामुळे तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही याच रोगाने तुरीचं उत्पादन जवळपास ५० ते ६० टक्के घटलं होतं. त्यामुळे फायटोप्थोरा ब्लाईट या रोगाचा प्रादुर्भाव दिसताक्षणी शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.



रब्बीच्या हंगामात बळीराजाचा अवकाळीशी सामना


रब्बीच्या हंगामात राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Rain Updates) तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाच्या (Department of Meteorology) वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळीशी (Unseasonal Rain) सामना करावा लागणार आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना