बुलढाणा : अनियमित पाऊस (Irregular Rain) आणि बदलते खराब हवामान (Bad weather) याचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे निदान रब्बी हंगामात (Rabi Season) चांगली पिके होतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, खराब हवामानामुळे रब्बी हंगामातील तुरीच्या पिकावर ‘फायटोप्थोरा ब्लाईट’ (Phytophthora blight) या बुरशीजन्य रोगाचा (Fungus disease) प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील सहा लाख हेक्टरवरील तुरीचं पीक धोक्यात आलं आहे.
खरीप हंगामाच्या वेळी राज्यांत अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक भागांत कमी पाऊस पडल्याने खरीप पिके झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता थोडीफार तुरीच्या पिकाची अपेक्षा होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तुरीचं पीक हिरवेगार होतं. मात्र, याही पिकांवर बदलत्या वातावरणामुळे ‘फायटोप्थोरा ब्लाईट’ या बुरशीजन्य रोगानं शिरकाव केला आहे. आता हिरवंगार तुरीचं पीक पिवळं पडून सुकू लागलं आहे.
राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. पण या रोगामुळे तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही याच रोगाने तुरीचं उत्पादन जवळपास ५० ते ६० टक्के घटलं होतं. त्यामुळे फायटोप्थोरा ब्लाईट या रोगाचा प्रादुर्भाव दिसताक्षणी शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
रब्बीच्या हंगामात राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Rain Updates) तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाच्या (Department of Meteorology) वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळीशी (Unseasonal Rain) सामना करावा लागणार आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…