Fungus disease : तुरीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी पुन्हा चिंतेत

  137

रब्बी हंगामात करावा लागणार अवकाळीचा सामना


बुलढाणा : अनियमित पाऊस (Irregular Rain) आणि बदलते खराब हवामान (Bad weather) याचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे निदान रब्बी हंगामात (Rabi Season) चांगली पिके होतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, खराब हवामानामुळे रब्बी हंगामातील तुरीच्या पिकावर 'फायटोप्थोरा ब्लाईट' (Phytophthora blight) या बुरशीजन्य रोगाचा (Fungus disease) प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील सहा लाख हेक्टरवरील तुरीचं पीक धोक्यात आलं आहे.


खरीप हंगामाच्या वेळी राज्यांत अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक भागांत कमी पाऊस पडल्याने खरीप पिके झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता थोडीफार तुरीच्या पिकाची अपेक्षा होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तुरीचं पीक हिरवेगार होतं. मात्र, याही पिकांवर बदलत्या वातावरणामुळे 'फायटोप्थोरा ब्लाईट' या बुरशीजन्य रोगानं शिरकाव केला आहे. आता हिरवंगार तुरीचं पीक पिवळं पडून सुकू लागलं आहे.


राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. पण या रोगामुळे तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही याच रोगाने तुरीचं उत्पादन जवळपास ५० ते ६० टक्के घटलं होतं. त्यामुळे फायटोप्थोरा ब्लाईट या रोगाचा प्रादुर्भाव दिसताक्षणी शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.



रब्बीच्या हंगामात बळीराजाचा अवकाळीशी सामना


रब्बीच्या हंगामात राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Rain Updates) तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाच्या (Department of Meteorology) वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळीशी (Unseasonal Rain) सामना करावा लागणार आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ