Yerwada Jail Pune : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून फरार!

कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह


पुणे : मागील काही दिवसांत पुण्याच्या येरवडा कारागृहातून (Yerwada Jail Pune) कैदी पसार होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडली आहे. एका खुनाच्या आरोपाखाली पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव (Aashish Jadhav) हा पळून गेला आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो तुरुंगातून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.


काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली. त्यावेळेस अशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. त्यामुळे जाधव फरार झाल्याचं लक्षात आलं. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा करागृहातूनच तो पळाल्याने कारागृहाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.


आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात २००८ पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. त्याच दरम्यान तो पळून गेला असावा असा पोलिसांना संशय आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली