Poems : काव्यरंग

हिवाळ्याचं पाऊल


बाजेवरती बसून आजोबा
आदेश सोडती बाबाला
खारीक खोबरे घेऊन या रे
लाडक्या माझ्या नाताला

उन्हात बसून टोपी शिवते
आजी सांगते आईला
स्वेटर नवीन घेऊन या रे
लाडक्या माझ्या ताईला

मोठ्ठा आमचा मामा जेव्हा
गावी निघतो यायला
सुकामेवा आणीन म्हणतो
हिवाळ्याचा खायला

जसं पडतं अंगणामध्ये
हिवाळ्याचं पाऊल
आजी, आजा, मामा यांना
लागते पहिली चाहूल

हिवाळ्याच्या ऋतूमध्ये
कपडे आणतात ऊबदार
सुकामेवा खाऊन पुष्ठ
तब्येत बनते रुबाबदार
- भानुदास धोत्रे, परभणी

उंदीरमामाचा आजार


गारठणाऱ्या थंडीत
बिळाबाहेर आला उंदीरमामा
अंगात नव्हते स्वेटर
नव्हती कशाची तमा

सकाळी सकाळी
हवा होती गार
खोकलून खोकलून
झाला तो बेजार

दुखू लागले डोके
झाली त्याला सर्दी
बिळातल्या मित्रांची
झाली खूप गर्दी

कुणी दिले चाटन
कुणी दिले औषध कडू
बिचाऱ्या उंदीरमामाला
फुटले मग रडू

विविध घेतली औषधे
तरी वाटेना बरे
उंदीरमामा गेला त्रासून
उपाय संपले सारे

शेवटी एका मित्राचा
उपाय आला कामी
सुंठमिऱ्याचा काढा देऊन
युक्ती शोधली नामी

काही वेळातच उंदीरमामाचा
आजार दूर पळाला
आनंदाच्या भरात म्हणे
चला सर्व खेळायला

- रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ
Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

विश्वासघात

संस्कृतीचा गोडवा-पूर्णिमा शिंदे पुण्यातील कर्वेनगर येथे स्थायिक असलेले संध्या आणि विनोद शहा हे व्यापारी असतात.

बाळू

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड बाळू माझा विद्यार्थी. अगदी भारी दांड. मी तेव्हा उदयाचलात पर्यवेक्षक होते. एका