Onkar Bhojane : माझं असंच आहे, मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत नाही...

हास्यजत्रा सोडलेला ओंकार भोजने पुन्हा करणार एन्ट्री?


मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी प्रहसनांचा (Comedy skits) कार्यक्रम सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. यातील कलाकारांच्या विनोदाचं अचूक टायमिंग, नवनवीन विषय व ते हाताळताना प्रेक्षकांना हसवण्याची पद्धत यांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. यातील प्रत्येक कलाकाराने जी वेगवेगळी पात्रं रंगवली आहेत, तीदेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. यामध्ये नम्रता संभेरावची (Namrata Sambherao) लॉली असो, प्रसाद खांडेकरचा (Prasad Khandekar) स्लोमॅन, समीर चौघुलेचा (Samir Choughule) सुमारिया चौघुलिया किंवा लोचन मजनू अशी अनेक पात्रे प्रेक्षकांना खळखळून हसवतात.


याच हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळालेला कलाकार म्हणजे ओंकार भोजने (Onkar Bhojane). ओंकारने काही महिन्यांपूर्वी हास्यजत्रा सोडली होती. तो पुन्हा येणार नाही अशी चर्चा असल्याने प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली होती. ओंकारचं अगं अगं आई हे स्किट असो, किंवा वायरमॅन तात्या, किंवा वनिता खरातसोबत मामा मामीचं स्किट अशी ओंकारची सर्वच पात्रं प्रेक्षकांना आवडत असताना त्याने असा का ब्रेक घेतला असा प्रश्न पडला होता.


दरम्यान, ओंकारचे 'सरला एक कोटी' व 'बॉईज ४' असे दोन चित्रपट आले. या चित्रपटांच्या शूटिंगमुळेच हास्यजत्रेतून ब्रेक घ्यावा लागला असं त्याने स्पष्ट केलं आहे. यानंतर तो पुन्हा एकदा हास्यजत्रेतून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या नव्या स्किटचा प्रोमो आला असून यात ओंकार 'माझं असंच आहे, मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत नाही...' असा एक डायलॉग म्हणतो आणि त्यावर सगळे खूप हसतात. म्हणजेच ओंकारची एन्ट्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.


ओंकार भोजने याविषयी सांगतो की, 'सगळं छान सुरु होतं, पण मला पुढे दोन चित्रपटांसाठी थांबायचं होतं. त्यांना पण अॅडजेस्टमेंट करावी लागणार होती. माझ्या प्रकृतीच्या पण काही तक्रारी होत्या. तेव्हा सुट्टी घेतली ती कायमचीच. नंतर मी फू बाई फू मध्ये काम केलं. मी या सगळ्यामधून शिकत आहे.' ओंकार भोजने आता हास्यजत्रेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन