Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला?


पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला राखून


मुंबई : मुंबईतील विविध भागांसाठी महापालिकेच्यावतीने तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या कुठे गेल्या आणि कुणाकुणाला दिल्या गेल्या याचा हिशोब आधी द्या अशी मागणीच स्थायी समिती सदस्यांनी केली. एवढेच नाहीतर कचऱ्याच्या खासगीकरणाचा कंत्राट मंजूर करताना कंपनीच्यावतीने मनुष्यबळ, वाहने तसेच कचरा पेट्यांचेही वाटप होणार आहे, तर मग या कचरा पेट्या कशासाठी खरेदी केल्या जात आहे असा सवाल समितीने केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे येईपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवला.


मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून रस्त्यांवरील सार्वजनिक कचरा कुंडयांचे संख्या कमी केली जात असतानाच आता महापालिका प्रशासन तब्बल १३ हजार ५०० कचरा कुंड्यांची खरेदी करणार आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या २४० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्यांची खरेदी करण्यात येत असून या कचरा पेट्यांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पात्र ठरलेल्या प्रायमा प्लास्टिक्स लिमिटेड कंपनीची निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल २०३९ दराने २४० लिटर क्षमतेच्या या १३,५०० कचरा पेट्यांची खरेदी केली जाणार आहे.


याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आला असता शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी याची खरेदी जेम पोर्टलवरुन का केली नाही असा सवाल करत कुठल्या विभागाला किती आणि नगरसेवकांना किती मिळणार याची कुठेच या प्रस्तावात माहिती देण्यात आली नसल्याने पूर्ण माहितीसह प्रस्ताव आणला जावा अशी मागणी केली. यात उत्पादक कंपन्यांनी भाग घेतला ही चांगली बाब आहे. मग मागील वर्षी जास्त दरात या कचरा पेट्यांची खरेदी करण्यात आली होती, तेव्हा कोणत्या कंपनीकडून घेतली जात आहे आणि आता कमी दराने खरेदी केली जात आहे, त्यामुळे या पेट्यांचा दर्जा कसा असेल असा सवाल शीतल गंभीर यांनी केला.


तर भाजपच्या प्रिती सातम यांनी आरे कॉलनीला कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड केले जात असल्याचा आरोप करत याठिकाणी कचरा पेट्याही आहेत आणि गाड्याही येतात. परंतु उचलला जाणारा कचरा येथील जंगलात नेऊन टाकला जातो. त्यामुळे एकप्रकारे आरे कॉलनीला भविष्यात डम्पिंग ग्राऊंड बनवले जात असल्याचा आरोप केला. तसेच कचऱ्याच्या खासगी कंत्राट कामांमध्ये कचर पेट्यांचे वितरण जर संबंधित कंपनी करणार असेल तर या पेट्यांची खरेदी का आणि कुणासाठी केली जात आहे याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. डॉ सईदा खान यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. तर मागील चार वर्षांत वितरण झालेल्या कचरा पेट्यांची वार्डनिहाय माहिती देण्याची मागणी केली. तर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी घरोघरी कचरा पेट्यांची देण्याची मागणी केली. तर यामिनी जाधव यांनी सुमारे ५० लाखांचे काम आधीच देण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून येईपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या