Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.बुद्धमूर्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट देऊन राज्यपालांचा शाल पुष्पगुच्छ देऊन ना. रामदास आठवले यांनी सत्कार केला.


महाराष्ट्रातील धर्मांतरित बौद्धांची जनगणनेत अनुसूचित जातीत नोंद करण्यात यावी.राज्यात ज्यांनी अनुसूचित जातीतून बौद्ध धम्मात धर्मांतर केले आहे अशा नवबौद्ध समाजाची नोंद जनगणनेत अनुसूचित जातीत व्हावी या मागणीबाबत ना. रामदास आठवले यांनी महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याशी सविस्तर चर्चा करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराचा इतिहास सांगितला.


तसेच अनुसूचित जाती जमाती; इतर मागासवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांना - अधिकाऱ्यांना पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे आणि गायरान जमिनीवरील १४ एप्रिल २००० सालापर्यंत चे अतिक्रमण नियमित करावे या मागण्यांचे निवेदन ना. रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिले. या निवेदनातील विषयांवर राज्यसरकारला निर्देश देण्याची मागणी ना. रामदास आठवले यांनी राज्यपालांना केली.त्यावर निवेदन वाचून प्रश्नांचा अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांनी ना.रामदास आठवले यांना दिले. यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिष्टमंडळाने ही ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेतली.त्यात पी ए सोसायटीचे उपाध्यक्ष पद्मश्री सुखदेव थोरात; वासुदेव गाडे; चंद्रशेखर कांबळे यांचा समावेश होता.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे; कांतिकुमार जैन; अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख; चंद्रपूर चे रिपाइं नेते अशोक घोटेकर; सुनील बन्सी मोरे; आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील