Death: सिगारेट प्यायल्याने दरवर्षी तब्बल इतक्या लोकांचा होता मृत्यू, आकडा ऐकून व्हाल हैराण

नवी दिल्ली: देशाची राजधानी आणि त्याजवळील आसपासच्या क्षेत्रात प्रदूषणाने लोकांचे जगणे कठीण केले आहे. लोकांना विषारी हवेत श्वास घेणे कठीण झाले आहे. मुलांसाठी तसेच वयस्कर लोकांसाठी ही विषारी हवा जणू मृ्त्यूचे आमंत्रणच आहे. प्रदूषण वाढवण्यात सिगारेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे.


तुम्हाला ऐकून धक्का बसेल की सिगारेट केवळ वाढते प्रदूषणासाठी कारणीभूत नाही आहे तर यामुळे लोक आपला जीवही गमावत आहेत. WHOच्या रिपोर्टनुसार सिगारेटमुळे दररोज तब्बल हजारोंच्या संख्येने मृत्यू होतात.



काय म्हणतो रिपोर्ट?


तंबाखूचे सेवन करणारे अर्धे लोक यामुळे आपला जीव गमावतात. तंबाखूमुळे दरवर्षी तब्बल ८० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यामुत १३ लाख लोक असे आहेत जे स्वत:सिगारेट ओढत नाहीत मात्र इतर लोकांच्या सिगारेटच्या धुरामुळे यांचा मृत्यू होतो.



सर्वाधिक पुरुष करतात तंबाखूचे सेवन


जगभरात एकूण तंबाखू खाण्याऱ्यांची संख्या १.३ अब्ज आहे. यातील ८० टक्के लोकसंख्या निम्न आणि मध्यम वर्गातील देशांची आङे. २०२०मध्ये जगातील २२.३ टक्के लोकसंख्येने तंबाखूचा वापर करते यात ३६.७ टक्के पुरुष आणि ७.८ टक्के महिला आहेत. तंबाखू महामारीपासून बचावासाठी WHOच्या सदस्य देशांनी २००३मध्ये WHO फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन टोबॅको कंट्रोलला वापरले आहे.

Comments
Add Comment

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या

नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या

पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार

कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार