बंगळुरू: न्यूझीलंडने(new zealand) श्रीलंकेला(srilanka) ५ विकेटनी हरवले. या विजयानंतर न्यूझीलंडच्या संघाने सेमीफायनलमध्ये आपली मजबूत दावेदारी सादर केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना जोरदार झटका बसला आहे. या विजयानंतर न्यूझीलंडचे ९ सामन्यानंतर १० पॉईंट्स झाले आहे. न्यूझीलंडचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडसमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान होते. न्यूझीलंडने हे आव्हान २३.२ षटकांत ५ विकेट गमावत पूर्ण केले. श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला न्यूझीलंड संघाची सुरूवात दमदार झाली. न्यूझीलंडचा सलामीवीर ड्वेन कॉनवे आणि रचिन रवींद्रने पहिल्या विकेटसाठी १२.२ षटकांत ८६ धावांची भागीदारी केली. ड्वेन कॉनवेने ४२ बॉलमध्ये ४५ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार लगावले. ड्वेन कॉनवेला दुष्मांचा चमिराने बाद केले.
न्यूझीलंडला रचिन रवींद्रच्या रूपात दुसरा झटका बसला. रचिन रवींद्रने ३४ बॉलमध्ये ४२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. रचिन रवींद्रने महीश तीक्ष्णाला बाद केले. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्स पॅव्हेलियनमध्ये परतला. केन विल्यमसन्सने १५ बॉलमध्ये १४ धावा केल्या. केन विल्यमसन्सला अँजेलो मॅथ्यूजला आपली शिकार बनवली.
याआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला ४६.४ ओव्हरमध्ये १७१ धावा करता आल्या. श्रीलंकेसाठी कुसल परेराने ५० धावांची खेळी केली. कुसल परेराने २८ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…