Nitesh Rane Sindhudurga : सिंधुदुर्गात नितेश राणे यांचीच जादू कायम; ओटव ग्रामपंचायत भाजपकडे

जाणून घ्या दुपारी बारा वाजेपर्यंत कोणाच्या खात्यात किती जागा...


सिंधुदुर्ग : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Grampanchayat Elections) काल रविवारी पार पडल्या. राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींची आज मतमोजणी होत आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकींतून आजमावता येणार आहे. यातील काही निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीत सामील असणार्‍या पक्षांनी आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

सिंधुदुर्गात (Sindhudurga) तळकोकणात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांची जादू कायम आहे. कणकवलीतील ओटव ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण राणे कुटुंबियांचं सिंधुदुर्ग भागात मोठं वर्चस्व आहे. कोकणसाठी अनेक विकासकामं राणे कुटुंबियांनी केली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही त्यांचाच दबदबा कायम राहिला आहे.


दरम्यान, आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपनेच सगळ्यांत जास्त जागा जिंकल्या आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार,
भाजप – १५१ जागा
अजित पवार गट – १२६ जागा
शिवसेना – ९८ जागा
काँग्रेस – ६८ जागा
ठाकरे गट – ६० जागा
शरद पवार गट – ५६ जागा
इतर – ८८ जागा
आतापर्यंत एकूण ३७५ जागा मिळवत महायुतीची यशस्वी घोडदौड सुरु आहे. तर मविआला १८४ व इतर पक्षांना ८८ जागा जिंकता आल्या आहेत.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व