Chandani Chowk Pune flyover : चांदणी चौकातील पुलाला उद्घाटनानंतर अडीच महिन्यांतच पडले खड्डे!

Share

सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी रहिवाशांनी काढला मोर्चा

पुणे : सध्या राज्यातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी वाढलेल्या गाड्यांमुळे वाहतूक नियंत्रणाची (Traffic Control) समस्या उद्भवत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे वाहतुकीत अडचणी येत आहेत. पुण्यातील चांदणी चौकात नुकत्याच एका पुलाचे (Chandani Chowk Pune flyover) उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, अडीच महिन्यांतच या पुलाला खड्डे पडायला लागले. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी वेधभवन परिसरात सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

कोट्यावधी रुपये खर्च करुन चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत केल्याचा दावा करण्यात येत असला तरी कोथरुडवरुन (Kothrud) येण्यासाठी प्रचंड समस्यांना सोमोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे. उद्धाटनानंतर अडीच महिन्यांतच येथील पुलाची अवस्था बिकट झाली आहे. शेकडो कोटी रुपये खर्च करुन उभारलेल्या या प्रकल्पातून पुणेकरांना काय साध्य झालं? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे वेधभवन परिसरातील हजारो नागरिकांनी सुरक्षित रस्ता मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढला.

चांदणी चौकातील पुलाचे १२ ऑगस्ट रोजी उद्घाटन झाले होते. परंतु अडीच महिन्यांच्या आतच निकृष्ट कामामुळे पुलाला खड्डे पडायला सुरुवात झाली आणि लक्षात आलं की, या पुलाच्या एक्स्पांशन जॉइंटचं (Expansion Joint) काम राहून गेलं आहे. त्यामुळे आता या पुलाला ज्या आठ लेन आहेत त्या आठही लेन नव्याने उकरुन एक्स्पांशन जॉइंटचं काम करावं लागणार आहे.

दरम्यान, या पुलाला काही फूट अंतराचे म्हणजे ज्यांच्या फटीतून खालचा रस्ता दिसू शकेल इतके भयानक खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती उदभवण्याचं कारण NHAI च्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं. या पुलाच्या उद्धाटनाची घाई करण्यात आल्याने एक्स्पांशन जॉइंटचं काम राहिलं असं ते म्हणाले. यासाठी पुलामध्ये नव्याने आणखी लोखंडी अँगल टाकले जाणार आहेत, आणि त्यातून हे खड्डे सांधले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांचा त्रास वाढणार आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

36 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

2 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago