Chandani Chowk Pune flyover : चांदणी चौकातील पुलाला उद्घाटनानंतर अडीच महिन्यांतच पडले खड्डे!

  120

सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी रहिवाशांनी काढला मोर्चा


पुणे : सध्या राज्यातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी वाढलेल्या गाड्यांमुळे वाहतूक नियंत्रणाची (Traffic Control) समस्या उद्भवत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे वाहतुकीत अडचणी येत आहेत. पुण्यातील चांदणी चौकात नुकत्याच एका पुलाचे (Chandani Chowk Pune flyover) उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, अडीच महिन्यांतच या पुलाला खड्डे पडायला लागले. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी वेधभवन परिसरात सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे.


कोट्यावधी रुपये खर्च करुन चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत केल्याचा दावा करण्यात येत असला तरी कोथरुडवरुन (Kothrud) येण्यासाठी प्रचंड समस्यांना सोमोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे. उद्धाटनानंतर अडीच महिन्यांतच येथील पुलाची अवस्था बिकट झाली आहे. शेकडो कोटी रुपये खर्च करुन उभारलेल्या या प्रकल्पातून पुणेकरांना काय साध्य झालं? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे वेधभवन परिसरातील हजारो नागरिकांनी सुरक्षित रस्ता मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढला.


चांदणी चौकातील पुलाचे १२ ऑगस्ट रोजी उद्घाटन झाले होते. परंतु अडीच महिन्यांच्या आतच निकृष्ट कामामुळे पुलाला खड्डे पडायला सुरुवात झाली आणि लक्षात आलं की, या पुलाच्या एक्स्पांशन जॉइंटचं (Expansion Joint) काम राहून गेलं आहे. त्यामुळे आता या पुलाला ज्या आठ लेन आहेत त्या आठही लेन नव्याने उकरुन एक्स्पांशन जॉइंटचं काम करावं लागणार आहे.


दरम्यान, या पुलाला काही फूट अंतराचे म्हणजे ज्यांच्या फटीतून खालचा रस्ता दिसू शकेल इतके भयानक खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती उदभवण्याचं कारण NHAI च्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं. या पुलाच्या उद्धाटनाची घाई करण्यात आल्याने एक्स्पांशन जॉइंटचं काम राहिलं असं ते म्हणाले. यासाठी पुलामध्ये नव्याने आणखी लोखंडी अँगल टाकले जाणार आहेत, आणि त्यातून हे खड्डे सांधले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांचा त्रास वाढणार आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती