Chandani Chowk Pune flyover : चांदणी चौकातील पुलाला उद्घाटनानंतर अडीच महिन्यांतच पडले खड्डे!

सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी रहिवाशांनी काढला मोर्चा


पुणे : सध्या राज्यातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी वाढलेल्या गाड्यांमुळे वाहतूक नियंत्रणाची (Traffic Control) समस्या उद्भवत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे वाहतुकीत अडचणी येत आहेत. पुण्यातील चांदणी चौकात नुकत्याच एका पुलाचे (Chandani Chowk Pune flyover) उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, अडीच महिन्यांतच या पुलाला खड्डे पडायला लागले. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी वेधभवन परिसरात सुरक्षित रस्त्यांच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे.


कोट्यावधी रुपये खर्च करुन चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत केल्याचा दावा करण्यात येत असला तरी कोथरुडवरुन (Kothrud) येण्यासाठी प्रचंड समस्यांना सोमोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे. उद्धाटनानंतर अडीच महिन्यांतच येथील पुलाची अवस्था बिकट झाली आहे. शेकडो कोटी रुपये खर्च करुन उभारलेल्या या प्रकल्पातून पुणेकरांना काय साध्य झालं? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे वेधभवन परिसरातील हजारो नागरिकांनी सुरक्षित रस्ता मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढला.


चांदणी चौकातील पुलाचे १२ ऑगस्ट रोजी उद्घाटन झाले होते. परंतु अडीच महिन्यांच्या आतच निकृष्ट कामामुळे पुलाला खड्डे पडायला सुरुवात झाली आणि लक्षात आलं की, या पुलाच्या एक्स्पांशन जॉइंटचं (Expansion Joint) काम राहून गेलं आहे. त्यामुळे आता या पुलाला ज्या आठ लेन आहेत त्या आठही लेन नव्याने उकरुन एक्स्पांशन जॉइंटचं काम करावं लागणार आहे.


दरम्यान, या पुलाला काही फूट अंतराचे म्हणजे ज्यांच्या फटीतून खालचा रस्ता दिसू शकेल इतके भयानक खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती उदभवण्याचं कारण NHAI च्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं. या पुलाच्या उद्धाटनाची घाई करण्यात आल्याने एक्स्पांशन जॉइंटचं काम राहिलं असं ते म्हणाले. यासाठी पुलामध्ये नव्याने आणखी लोखंडी अँगल टाकले जाणार आहेत, आणि त्यातून हे खड्डे सांधले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांचा त्रास वाढणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित

RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी