दिवाळीआधीच दिल्लीतील प्रदूषणाने गाठली धोक्याची पातळी, श्वास घेणेही झाले कठीण

नवी दिल्ली: भारताची राजधानी दिल्ली आणि जवळील राज्यातील शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे लोकांना श्वास घेणेही कठीण होत चालले आहे. सगळीकडे स्मॉग दिसत आहे. आरोग्य तज्ञांनी सकाळी फिरण्यासही मनाई केली आहे. आज सकाळी दिल्लीमध्ये धुराची चादर पसरलेली दिसली. एकूण AQI ३४६ सोबत दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खूपच खराब श्रेणीमध्ये आहे.


तर गुरूवारी दिल्लीच्या १२ ठिकाणांवरील हवेची गुणवत्ता पातळी ४०० पार म्हणजेच गंभीर स्थितीत पोहचली आहे. रेस्पिरर रिपोर्टनुसार ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत पीएम २.५चा स्तर देशात सर्वाधिक होता आणि २०२१नंतर यात सातत्याने वाढ होत आहे.


रिपोर्टनुसार, गेल्या पाच वर्षातील हवेच्या गुणवत्तेबाबत विश्लेषण रिपोर्टमध्ये सांगितले गेले की येथील देशातील चार प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. तर लखनऊ आणि पाटणासारख्या राज्याच्या राजधांनीमध्ये घसरण झाली आहे.


दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकातामध्ये ऑक्टोबर २०२३मध्ये पीएम २.५चा स्तार एक वर्षाआधी तुलनेत अधिक होता. तर चेन्नईत एक वर्ष आधी तुलनेत २३ टक्के घसरण झाली होती. राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सगळीकडे धुके तसेच वातावरण थंड होते. तेथील कमीत कमी तापमान १६.३ डिग्री सेल्सियस होते.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या