दिवाळीआधीच दिल्लीतील प्रदूषणाने गाठली धोक्याची पातळी, श्वास घेणेही झाले कठीण

नवी दिल्ली: भारताची राजधानी दिल्ली आणि जवळील राज्यातील शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे लोकांना श्वास घेणेही कठीण होत चालले आहे. सगळीकडे स्मॉग दिसत आहे. आरोग्य तज्ञांनी सकाळी फिरण्यासही मनाई केली आहे. आज सकाळी दिल्लीमध्ये धुराची चादर पसरलेली दिसली. एकूण AQI ३४६ सोबत दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खूपच खराब श्रेणीमध्ये आहे.


तर गुरूवारी दिल्लीच्या १२ ठिकाणांवरील हवेची गुणवत्ता पातळी ४०० पार म्हणजेच गंभीर स्थितीत पोहचली आहे. रेस्पिरर रिपोर्टनुसार ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत पीएम २.५चा स्तर देशात सर्वाधिक होता आणि २०२१नंतर यात सातत्याने वाढ होत आहे.


रिपोर्टनुसार, गेल्या पाच वर्षातील हवेच्या गुणवत्तेबाबत विश्लेषण रिपोर्टमध्ये सांगितले गेले की येथील देशातील चार प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. तर लखनऊ आणि पाटणासारख्या राज्याच्या राजधांनीमध्ये घसरण झाली आहे.


दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकातामध्ये ऑक्टोबर २०२३मध्ये पीएम २.५चा स्तार एक वर्षाआधी तुलनेत अधिक होता. तर चेन्नईत एक वर्ष आधी तुलनेत २३ टक्के घसरण झाली होती. राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सगळीकडे धुके तसेच वातावरण थंड होते. तेथील कमीत कमी तापमान १६.३ डिग्री सेल्सियस होते.

Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा