Rohit Sharma : दहा वर्षांपूर्वी याच दिवशी द्विशतक करणारा रोहित शर्मा आज दुसर्‍याच बॉलवर आऊट!

एक चौकार आणि रोहित शर्मा मैदानाबाहेर... तर विराट कोहलीचा नवा विक्रम


मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या वर्ल्डकपची (World Cup 2023) हवा सुरु आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्डकपमधील सर्वाधिक सहा सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) सुरु असणार्‍या भारत विरुद्ध श्रीलंका (India Vs Shrilanka) सामन्यात भारतच बाजी मारणार, असा विश्वास बहुसंख्य चाहत्यांना आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मात्र याबाबत भारतीयांच्या पदरी निराशा पाडली आहे. केवळ एका चौकारावर श्रीलंकेने रोहित शर्माला मैदानाबाहेर पाठवलं.


श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताचे फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोरदार फलंदाजी करण्यासाठी मैदानात सज्ज झाले. रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि स्टेडिअमवर चाहत्यांचा आवाज वाढला. आज रोहित नवा विक्रम रचणार असं भारतीयांना वाटणार तोच श्रीलंकेचा गोलंदाज मधुशंकाने रोहितचा त्रिफळा उडवला आणि वानखेडे स्टेडिअम चिडीचुप्प झाले.


खरं तर २ नोव्हेंबर हा दिवस रोहितसाठी अत्यंत खास आहे. दहा वर्षांपूर्वी याच दिवशी रोहितने त्याच्या करिअरमधील पहिले द्विशतक (Double century) ठोकले होते. तो आज पुन्हा एकदा सर्वोत्तम धावांची खेळी करेल अशी अपेक्षा चाहत्यांची होती, मात्र दुसर्‍याच बॉलवर त्यांच्या पदरी निराशा पडली.



विराट कोहलीचा नवा विक्रम


दरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli) मात्र एक नवा विक्रम रचला आहे. एका वर्षात १००० धावा करण्याची ही त्याची आठवी वेळ असल्याने त्याने सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडीत काढला आहे. सचिनने हा विक्रम एकूण सात वेळा केला होता. विराटने या वर्षात आतापर्यंत एकूण ९६६ धावा काढल्या होत्या. त्यामुळे हा विक्रम रचण्यासाठी त्याला आजच्या सामन्यात केवळ ३४ धावांची गरज होती. सध्या विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध फॉर्ममध्ये असून विक्रम रचण्यात यशस्वी झाला आहे. यापुढे भारत विरुद्ध श्रीलंका सामना काय रंगत आणणार, कोणाचा विजय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील