मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या वर्ल्डकपची (World Cup 2023) हवा सुरु आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्डकपमधील सर्वाधिक सहा सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) सुरु असणार्या भारत विरुद्ध श्रीलंका (India Vs Shrilanka) सामन्यात भारतच बाजी मारणार, असा विश्वास बहुसंख्य चाहत्यांना आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मात्र याबाबत भारतीयांच्या पदरी निराशा पाडली आहे. केवळ एका चौकारावर श्रीलंकेने रोहित शर्माला मैदानाबाहेर पाठवलं.
श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताचे फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोरदार फलंदाजी करण्यासाठी मैदानात सज्ज झाले. रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि स्टेडिअमवर चाहत्यांचा आवाज वाढला. आज रोहित नवा विक्रम रचणार असं भारतीयांना वाटणार तोच श्रीलंकेचा गोलंदाज मधुशंकाने रोहितचा त्रिफळा उडवला आणि वानखेडे स्टेडिअम चिडीचुप्प झाले.
खरं तर २ नोव्हेंबर हा दिवस रोहितसाठी अत्यंत खास आहे. दहा वर्षांपूर्वी याच दिवशी रोहितने त्याच्या करिअरमधील पहिले द्विशतक (Double century) ठोकले होते. तो आज पुन्हा एकदा सर्वोत्तम धावांची खेळी करेल अशी अपेक्षा चाहत्यांची होती, मात्र दुसर्याच बॉलवर त्यांच्या पदरी निराशा पडली.
दरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli) मात्र एक नवा विक्रम रचला आहे. एका वर्षात १००० धावा करण्याची ही त्याची आठवी वेळ असल्याने त्याने सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडीत काढला आहे. सचिनने हा विक्रम एकूण सात वेळा केला होता. विराटने या वर्षात आतापर्यंत एकूण ९६६ धावा काढल्या होत्या. त्यामुळे हा विक्रम रचण्यासाठी त्याला आजच्या सामन्यात केवळ ३४ धावांची गरज होती. सध्या विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध फॉर्ममध्ये असून विक्रम रचण्यात यशस्वी झाला आहे. यापुढे भारत विरुद्ध श्रीलंका सामना काय रंगत आणणार, कोणाचा विजय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…