Maratha Reservation : आमदारांनी मंत्रालयाला ठोकले टाळे! अधिवेशन बोलवण्याची केली मागणी

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एका बाजूला मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजही आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक सुरू असताना भाजप-शिवसेना वगळता अन्य सर्व आमदारांनी मंत्रालयात नाट्यमयरित्या स्टंटबाजी करत अजित पवार गटातील आमदारांनी चक्क मंत्रालयाला टाळं ठोकले.


मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने एक दिवसाचे अधिवेशन बोलवावे आणि निर्णय घ्यावा ही आमची मागणी आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही मंत्र्याला मंत्रालयात जाऊ देणार नाही, अशी भूमिका या आमदारांनी घेतली आहे. आंदोलन करत मंत्रालयाला टाळं ठोकणाऱ्या आमदारांमध्ये राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे यांचा समावेश आहे.


दरम्यान, आरक्षणासारख्या ज्वलंत मुद्द्यावर सर्वपक्षीय चर्चा करुन तोडगा काढून आणि समाजाला आरक्षण कसे मिळेल हे पाहण्याऐवजी आमदारच जर मंत्रालयाला टाळं ठोकत असतील तर निर्णय कोणी घ्यायचा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच सत्ताधारी चुकत असतील तर विरोधी पक्ष त्यांच्यावर अंकूश ठेवतात. त्यासाठी अनेकदा ते आंदोलनाचा मार्ग वापरतात. पण या प्रकरणात आमदारच मंत्रालयाला टाळे ठोकत असल्याने या आमदारांचे नेमके चाललंय काय, असा सवाल सामान्य जनता विचारत आहे.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले