Maratha Reservation : 'मराठा आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल


मुंबई : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) खरे मारेकरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच आहेत. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत, हे त्यांनाही माहित आहे आणि मराठा समाजालाही माहित आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण न टिकण्यासाठी ठाकरेच जबाबदार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.


उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का? असा संतप्त सवाल सरकारला केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.


'आम्ही करु शकलो नाही, पण हे करत आहेत म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मराठा आरक्षणावर बोलण्याचा ठाकरेंना नैतिक अधिकार नाही. ज्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. उच्च न्यायालयामध्ये त्या आरक्षणाला चॅलेंज देण्यात आलं, तिथेही ते आरक्षण टिकलं. ते टिकवण्याचं काम मी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते टिकवलं नाही', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.


दरम्यान, टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लावू नका असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलं आहे. तसेच मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं.


दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सध्या राज्यात चांगलाच पेटला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन अधिक आक्रमक होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसागणिक खालावत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाब निर्माण होत आहे. तर आरक्षणासाठी सरकारकडून देखील हालचालींना वेग आला आहे.

Comments
Add Comment

थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी केल्यानंतर थेट लिलाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची भरणा नियोजित वेळेत न

मुंबईतील मालमत्ता कर थकवणाऱ्या २० थकबाकीदारांची नावे जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणार मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.