Prakash Solanke house burnt : मराठा आंदोलकांनी आमदाराचे घर पेटवले!

  213

बीड : मराठा आंदोलनाचा (Maratha Andolan) मुद्दा राज्यभर चांगलाच तापला असून यावर अद्यापही तोडगा न निघाल्याने मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी जाळपोळ, गाड्या अडवणे असे प्रकार सुरु आहेत. त्यातच आज मराठा आंदोलकांनी बीडमध्ये थेट आमदाराचं घर पेटवलं. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घराजवळ पार्किंग लॉटमधील गाड्यांना मराठा आंदोलकांकडून आग लावण्यात आली. पसरलेल्या आगीमुळे घराचाही काही भाग जळाला आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.


आज सकाळी बीड जिल्ह्यात मराठा समाज आंदोलक आक्रमक झाले. माजलगावमध्ये मोर्चा सुरू असताना काही आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. यात घराच्या काचा फोडल्या. तसेच गाड्या जाळण्यात आल्या. यावेळी आमदार सोळंके आणि त्यांचे कुटुंबीय घरामध्येच होते. त्यात कोणत्याही स्वरुपाची दुखापत झाली नाही.



मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून प्रकृती अत्यंत खालावली आहे. याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. गावागावात आरक्षणासाठी साखळी उपोषण आणि मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. या रोषातूनच बीडमध्ये आमदाराचे घर जाळण्याची घटना घडली.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली