Prakash Solanke house burnt : मराठा आंदोलकांनी आमदाराचे घर पेटवले!

  219

बीड : मराठा आंदोलनाचा (Maratha Andolan) मुद्दा राज्यभर चांगलाच तापला असून यावर अद्यापही तोडगा न निघाल्याने मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी जाळपोळ, गाड्या अडवणे असे प्रकार सुरु आहेत. त्यातच आज मराठा आंदोलकांनी बीडमध्ये थेट आमदाराचं घर पेटवलं. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घराजवळ पार्किंग लॉटमधील गाड्यांना मराठा आंदोलकांकडून आग लावण्यात आली. पसरलेल्या आगीमुळे घराचाही काही भाग जळाला आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.


आज सकाळी बीड जिल्ह्यात मराठा समाज आंदोलक आक्रमक झाले. माजलगावमध्ये मोर्चा सुरू असताना काही आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. यात घराच्या काचा फोडल्या. तसेच गाड्या जाळण्यात आल्या. यावेळी आमदार सोळंके आणि त्यांचे कुटुंबीय घरामध्येच होते. त्यात कोणत्याही स्वरुपाची दुखापत झाली नाही.



मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून प्रकृती अत्यंत खालावली आहे. याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. गावागावात आरक्षणासाठी साखळी उपोषण आणि मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. या रोषातूनच बीडमध्ये आमदाराचे घर जाळण्याची घटना घडली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या