Train accident: आंध्र प्रदेश रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली, ९ जणांचा मृत्यू

विजयनगरम: आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात रविवारी रेल्वे अपघात झाला. या अपघातात कमीत कमी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली. मृत व्यक्तींना सरकारकडून भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या अपघाता प्रकरणी शोक व्यक्त केला.


रेल्वेच्या माहितीनुसार, या रेल्वे अपघातात सामील रेल्वेची नावे ०८५३२ विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि ०८५०५ विशाखापट्टणम -रायगडा पॅसेंजर स्पेशल होते. या अपघातामुळे अनेक रेल्वेंचे मार्ग बदलाावे लागले. ज्या मार्गावर हा अपघात झाला तो मार्ग हावडा-चेन्नई मार्ग म्हणून ओळखला जातो. सध्या रेल्वे मार्गावरील घसरलेले डबे दूर करण्याचे काम सुर आहे.



कसा झाला हा अपघात?


रेल्वेच्या माहितीनुसार, विजयनगरम जिल्ह्यात कांतकपल्लेमध्ये विशाखापट्टण-रायगडा पॅसेंजर स्पेशल रेल्वेने संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विशाखापट्ट्णम-पलासा पॅसेंजर रेल्वेला मागून धडक दिली. यामुळे या रेल्वेचे चार डबे रूळावरून घसरले.


 


रेल्वे मंत्र्यांकडून मदतीची घोषणा


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले रेल्वे अपघातातील पिडीतांना सरकारने मदतीची घोषणा केली आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाख रूपये, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना २ लाख रूपये तर किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज सेवा तीर्थ, कर्तव्य भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 'सेवा तीर्थ' आणि 'कर्तव्य भवन-१ आणि २'चे उद्घाटन करणार आहेत. नव्याने

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद