मराठा समाजाचे पेण मध्ये मंगळवार पासून साखळी उपोषण, पेण तहसीलदारांना दिले निवेदन

पेण(देवा परवी) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पेण तालुक्यातील सकल मराठा समाजा तर्फे उद्या मंगळवारी (दि.31 ऑक्टोबर) पासून पेण तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन पेण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पेण तहसीलदार यांना देण्यात आले.


यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, लहू पाटील, अविनाश पाटील, शिरीष मानकवळे, सागर पवार आदी मराठा नेते उपस्थित होते. मराठा समाजाला सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे - पाटील हे आंतरवली सराठी, जि.जालना येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पेण तालुक्यातील मराठा समाज देखील एकवटला आहे.


मंगळवारी पेण तहसीलदार कार्यालया समोर सकाळी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत अन्न त्याग साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सदरचे साखळी उपोषण हे मराठा समाजाच्या न्याय हक्काची मागणी शासन मान्य करे पर्यंत तसेच मनोज जरांगे - पाटील यांचे उपोषण सुरु असे पर्यंत हे साखळी उपोषण सुरु राहील असे पेण तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य