मराठा समाजाचे पेण मध्ये मंगळवार पासून साखळी उपोषण, पेण तहसीलदारांना दिले निवेदन

पेण(देवा परवी) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पेण तालुक्यातील सकल मराठा समाजा तर्फे उद्या मंगळवारी (दि.31 ऑक्टोबर) पासून पेण तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन पेण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पेण तहसीलदार यांना देण्यात आले.


यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, लहू पाटील, अविनाश पाटील, शिरीष मानकवळे, सागर पवार आदी मराठा नेते उपस्थित होते. मराठा समाजाला सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे - पाटील हे आंतरवली सराठी, जि.जालना येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पेण तालुक्यातील मराठा समाज देखील एकवटला आहे.


मंगळवारी पेण तहसीलदार कार्यालया समोर सकाळी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत अन्न त्याग साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सदरचे साखळी उपोषण हे मराठा समाजाच्या न्याय हक्काची मागणी शासन मान्य करे पर्यंत तसेच मनोज जरांगे - पाटील यांचे उपोषण सुरु असे पर्यंत हे साखळी उपोषण सुरु राहील असे पेण तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

Kolhapur Student Assault Video : ‘रँगिंग’च्या नावाखाली दहशत! हाॅस्टेलमध्ये सर्रास 'रॅगिंग' की टोळीयुद्ध? तळसंदे पाठोपाठ पेठवडगावमध्येही विद्यार्थ्यांची अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील खासगी वसतिगृहे (Hostel) आता विद्यार्थ्यांच्या अमानुष

'हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही': उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा सज्जड इशारा

३२ हजार कोटींच्या मदतीने विरोधकांचे राजकारण हाणून पाडले; 'मुंबई मनपासाठी थोडा हंबरडा शिल्लक ठेवावा' छत्रपती

Fake Currency: अरे बापरे! पोलिसानेच काढला होता बनावट नोटांचा कारखाना; असा केला पर्दाफाश!

'सिद्धकला चहा'मधून १ कोटींच्या बनावट नोटा जप्त; पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केला मोठा खुलासा मिरज (सांगली):

भारताचा इतिहास पराभवाचा नव्हे संघर्षाचा”- सरसंघचालक

नागपूर : भारतावर अनादी काळापासून सातत्याने हल्ले होत राहिले. परंतु, कुठलाही परकीय आक्रांता एक रात्र देखील

जिथे शक्य तिथे महायुती म्हणजे काय? महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

नाशिक : पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका)