मराठा समाजाचे पेण मध्ये मंगळवार पासून साखळी उपोषण, पेण तहसीलदारांना दिले निवेदन

  198

पेण(देवा परवी) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पेण तालुक्यातील सकल मराठा समाजा तर्फे उद्या मंगळवारी (दि.31 ऑक्टोबर) पासून पेण तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन पेण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पेण तहसीलदार यांना देण्यात आले.


यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, लहू पाटील, अविनाश पाटील, शिरीष मानकवळे, सागर पवार आदी मराठा नेते उपस्थित होते. मराठा समाजाला सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे - पाटील हे आंतरवली सराठी, जि.जालना येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पेण तालुक्यातील मराठा समाज देखील एकवटला आहे.


मंगळवारी पेण तहसीलदार कार्यालया समोर सकाळी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत अन्न त्याग साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सदरचे साखळी उपोषण हे मराठा समाजाच्या न्याय हक्काची मागणी शासन मान्य करे पर्यंत तसेच मनोज जरांगे - पाटील यांचे उपोषण सुरु असे पर्यंत हे साखळी उपोषण सुरु राहील असे पेण तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या