Ajit Pawar dignosed with dengue : अजित पवार नाराज नाहीत; तर त्यांना झाली आहे डेंग्यूची लागण

प्रफुल्ल पटेल यांची माहिती


मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोणत्याही शासकीय वा सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. शिवाय काल पार पडलेल्या माळेगावातील मोळीपूजनालाही ते उपस्थित राहिले नव्हते. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या (Maratha Samaj andolan) पार्श्वभूमीवर अजित पवार मुद्दाम जाण्याचे टाळत आहेत किंवा ते नाराज आहेत अशा चर्चांना यामुळे उधाण आले होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीचे कारण आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे अजित पवार यांना डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याची माहिती दिली आहे. यामुळे सर्व नाराजींच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.


प्रफुल्ल पटेल आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, अजित पवारांना शनिवारी डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार व विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की ते आपली समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील, अशी पोस्ट प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर केली आहे.


वाढत्या प्रदूषणामुळे, सांडपाण्यामुळे अनेक आजारांनी राज्याला विळखा घातला आहे. अनेक दिवसांपासून राज्यात डेंग्यूची साथही आली आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. याचाच फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसला आहे. अजित पवारांची तब्येत अचानक बिघडल्याने चाचणी केली त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अजित पवारांवर सध्या घरीच उपचार सुरु आहेत.




Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात