Ajit Pawar dignosed with dengue : अजित पवार नाराज नाहीत; तर त्यांना झाली आहे डेंग्यूची लागण

  77

प्रफुल्ल पटेल यांची माहिती


मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोणत्याही शासकीय वा सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. शिवाय काल पार पडलेल्या माळेगावातील मोळीपूजनालाही ते उपस्थित राहिले नव्हते. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या (Maratha Samaj andolan) पार्श्वभूमीवर अजित पवार मुद्दाम जाण्याचे टाळत आहेत किंवा ते नाराज आहेत अशा चर्चांना यामुळे उधाण आले होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीचे कारण आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे अजित पवार यांना डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याची माहिती दिली आहे. यामुळे सर्व नाराजींच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.


प्रफुल्ल पटेल आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, अजित पवारांना शनिवारी डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार व विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की ते आपली समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील, अशी पोस्ट प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर केली आहे.


वाढत्या प्रदूषणामुळे, सांडपाण्यामुळे अनेक आजारांनी राज्याला विळखा घातला आहे. अनेक दिवसांपासून राज्यात डेंग्यूची साथही आली आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. याचाच फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसला आहे. अजित पवारांची तब्येत अचानक बिघडल्याने चाचणी केली त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अजित पवारांवर सध्या घरीच उपचार सुरु आहेत.




Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.