आयुष्य वाकण्यात गेलं, तुम्ही ठाकरे नाही 'वाकरे' आडनाव लावा

  205

ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका


मुंबई : आम्हाला मिंधे म्हणता, तुम्ही अडीच वर्षे काय धंदे केले ते सांगा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर वाकण्यात आयुष्य गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ठाकरे नव्हे तर वाकरे आडनाव लावावे, अशी जहरी टीका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी केली. ज्या बाईने बाळासाहेबांना थेरडा असं संबोधलं, त्याच बाईला उद्धव ठाकरे आज सन्मान देतात, अशीही टीका त्यांनी सुषमा अंधारे यांचं नाव न घेता केली.


ज्योती वाघमारे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, तिकडे जमले आहेत सत्तेसाठी इमान विकलेले कावळे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आज या दसरा मेळाव्याच्या मंचावरून मी प्रश्न विचारते की मर्द कुणाला म्हणायचं? कोरोना काळात घरात बसणारा की पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेणारा? अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात जाणारा मर्द नसतो, रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा मर्द असतो. पेंग्विन आणणारा मर्द नाही तर अफजलखानाची वाघनखं आणणारा मर्द असतो. बाळासाहेबांच्या विचारांसाठी छाताडावर केसेस घेणारा मर्द असतो. मतांसाठी पावसात भिजणारे भरपूर असतात. पण लोकांच्या मदतीसाठी धावणारा मर्द असतो. अफजल खानाची समाधी उद्ध्वस्त करणारा मर्द असतो. एकनाथ शिंदे यांनी महिलांना सन्मान देणारी बाळासाहेब ठाकरेंची महिला आघाडी उभी केली, महिलांना सन्मान दिला. हे आम्हाला मिंधे म्हणतात, गद्दार म्हणतात. पण बंडखोरांचा इतिहास लिहिला जातोय, तळवे चाटणाऱ्यांचा नाही.


ज्योती वाघमारेंनी आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली. त्या म्हणाल्या की, बाळासाहेबांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी बाळासाहेबांना थेरडा म्हणणाऱ्या बाईला सन्मान दिला. तुळजाभवानीची चेष्टा करणारी बाई जर यांचा चेहरा असेल तर थू यांच्यावर. अशा बाईच्या पदराआड राजकारण करत असाल तर थू. हिंदुत्व विरोध करणाऱ्या लोकांना सन्मानाचं स्थान देताय. लोकांच्या पुढे वाकण्यात जिंदगी गेली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर ते कायम झुकले. आम्हाला मिंधे म्हणताय? अडीच वर्षे घरात बसून काय धंदे केलेत?

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता