Aditya Thackeray : दिशा, सुशांत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना १९ हजार ७० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस

Share

आमदार नितेश राणेंचा दावा खरा ठरला!

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आपल्या पत्रकार परिषदांमधून आदित्य ठाकरेच (Aditya Thackeray) दिशा सालियन (Disha Salian) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत, ही आत्महत्या (Suicide) नसून हत्या आहे, असा दावा वारंवार करत असतात. हा दावा खराच ठरला असून आता आदित्य ठाकरे आणखी अडचणीत सापडणार आहेत. राशिद खान पठाण (Rashid Khan Pathan) यांनी आदित्य ठाकरेंना १९ हजार ७० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस धाडली आहे.

उच्च न्यायालयातील शपथपत्रांमध्ये खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच, याचिकाकर्ते आणि साक्षीदारांकडून उत्तर प्रदेशात केस दाखल करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, रिपब्लिकन टीवीचे अर्णब गोस्वामी, सुशांत सिंह राजपूत फॅन्स, या प्रकरणांतील साक्षीदार, तक्रारकर्ते या सर्वांकडून आदित्य ठाकरेंविरुद्ध देशभर केसेस दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सर्व प्रसारमाध्यमांनांही न्यायप्रविष्ट हत्येच्या प्रकरणाला आत्महत्या न संबोधण्याचं आवाहन केलं आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध सामुहिक बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यातील सहभागाचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत, तरीदेखील कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने आदित्य ठाकरेंना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात यावेत, असं यात म्हटलं आहे. याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून त्यांचंसुद्धा म्हणणं ऐकावं आणि त्यांनादेखील उत्तरवादी बनवावं, अशी मागणी केली आहे.

राशिद खान पठाण यांच्या याचिकेत काय म्हटले आहे?

आदित्य ठाकरे यांचा सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंध असून त्याच्याशी संबंधित सर्व पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी दाखल केली आहे. सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी. याचबरोबर ८ जून, १३ जून व १४ जून या दिवसांचं आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

८ जून २०२० रोजीचं दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचं मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे १०० मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच १३ व १४ जून २०२० रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचंही मोबाईल लोकेशन तपासले जावेत, अशी मागणी राशिद यांनी याचिकेतून केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

प्रहार बुलेटीन: ०५ जुलै २०२४

दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…

35 mins ago

Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…

49 mins ago

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…

2 hours ago

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…

2 hours ago

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

3 hours ago

Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील भोलेबाबाचा गलिच्छ प्रकार उघडकीस!

भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…

3 hours ago