Earthquake: नेपाळच्या काठमांडूमध्ये भूकंपाचे धक्के, दिल्ली-NCR पर्यंत जाणवल्या हालचाली

  105

काठमांडू: भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपाचे हे झटके रविवारी सकाळी जाणवले. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की रविवारी नेपाळमध्ये ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला.


या भूकंपाचे केंद्रबिंदू काठमांडूपासून ५५ किमी दूर पश्चिममध्ये धाडिंगमध्ये होता. धाडिंग जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला खूप जोरात झटके जाणवले. काही लोक घरातून बाहेर आले.



दिल्ली-NCR जाणवले धक्के


आतापर्यंत या भूकंपामुळे कोणीही जखमी झाल्याचे वृ्त्त नाही. युरोपीय भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की भूंकप १३ किमी खोल होता. हा झटका बागमती आणि गडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्ये जाणवले. सोबतच भूकंपाचे झटके दिल्ली एनसीआर क्षेत्रातही जाणवले.



गेल्या रविवारीही दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले होते भूकंपाचे धक्के


एक आठवड्याआधी दिल्ली एनसीआरमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. दिल्लीसोबत नोएडा आणि गाझियाबादमध्ये धरती हलली होती. हरयाणाच्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. याआधी ३ ऑक्टोबरला राजधानी दिल्ली तसेच एनसीआरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या