India vs Bangladesh: कोहलीच्या शतकासाठी सोडल्या एकेरी धावा? राहुलने सांगितले सत्य

पुणे: भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने(virat kohli) एकदिवसीय करिअरमधील आपले ४८वे शतक झळकावताना भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. एकदिवसीय विश्वचषक २०२३मधील आपल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले. पुण्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात २५७ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने जबरदस्त शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.


भारतीय संघाचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय आहे. कोहलीने या सामन्यात नाबाद १०३ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट १०६.१८ इतका होता. मात्र सामना रोमांचक तेव्हा झाला जेव्हा विजयासाठी ६६ बॉलमध्ये १९ धावांची गरज होती. तेव्हा कोहली ८१ धावांवर नाबाद खेळत होता.



शेवटच्या १९ धावा बनवण्यासाठी कोहलीकडे होता स्ट्राईक


याचाच अर्थ विजयासाठी आणि कोहलीच्या शतकासाठी एकूण १९ धावांची गरज होती. तेव्हा नॉन स्ट्राईकला केएल राहुल उभा होता. यानंतर भारतीय संघाला विजय मिळवेपर्यंत म्हणजेच पुढील १५ बॉल कोहलीकडे स्ट्राईक राहिला. मध्येच कोहलीने अनेकदा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र राहुलने नकार दिला. मात्र ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर राहुलने एकेरी धाव घेतली. ज्यामुळे पुढील ओव्हरमध्ये कोहलीकडे पुन्हा स्ट्राईक येईल. यादरम्यान कोहलीला प्रत्येकवेळी धाव घ्यायची होती मात्र राहुल नकार देत होता कारण त्यामुळे कोहलीचे शतक पूर्ण होईल.



तुम्ही आरामात शतक पूर्ण करू शकता


याचा खुलासा राहुलने सामन्यानंतर केला. राहुलने सांगितले की, कोहलीला असे वाटत होते की त्याच्यावर कोणीही शतक पूर्ण करणय्याबाबत आरोप करू नये. मात्र राहुलने त्याला समजावले की आता बॉल खूप आहेत आणि टीम आरामात जिंकू शकते. अशातच तुम्ही शतक पूर्ण करू शकता. मी एकेरी धाव घेण्यास नकार देत होते. विराटने सांगितले होते की जर तु एकेरी धाव घेतली नाही तर ते वाईट असेल. लोक हाच विचार करतील की हा व्यक्तिगत स्कोरसाठी खेळत आहे. मात्र मी सांगितले की आपण आरामात सामना जिंकत आहोत तुम्ही तुमचे शतक पूर्ण करू शकता.

Comments
Add Comment

Sachin Siwach : राष्ट्रकुल खेळ २०२६: भारतीय बॉक्सर सचिन सिवाच 'राऊंड ऑफ १६' मध्ये

ग्लासगो : भारताचा स्टार बॉक्सर सचिन सिवाचने शनिवारी पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या 'राऊंड ऑफ १६' मध्ये प्रवेश

Common Wealth Games 2026 : पुन्हा डोपिंग प्रकरण, दहा दिवसांत चौथी घटना; भारताला बसला मोठा फटका

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ साठी भारताने १२६ जणांच्या संघाची घोषणा केली. पण भारताच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र

IND VS ZIM : हरारेमध्ये ईशान किशनचे वादळ, झिम्बाब्वेसमोर २२० धावांचं लक्ष्य

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे सुरू आहे. या

Ind VS Zim : झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत दिला भारताला दुहेरी धक्का ! अभिषेक आणि वैभव पॉवर प्ले संपण्यापूर्वी बाद

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे खेळवला जात आहे. या

Abhishek vs Vaibhav In T20 : अभिषेक की वैभव टी-२० चा खरा बादशाह कोण? आकडेवारी काय सांगते, जाणून घेऊया

मुंबई : अभिषेक आणि वैभव या दोघांपैकी टी-२० मध्ये सर्वात स्फोटक फलंदाज कोण? याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात

Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींकडून पॉवरलिफ्टर झंडू कुमारचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन

नवी दिल्ली : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका पदकासह आणि अनेक दमदार कामगिरींसह